"त्या काळात खूप काही सहन केलं, माझा शारीरिक... मयुरी वाघचा पियुष रानडे सोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांवर, विशेषतः पती पियुष रानडेसोबतच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अस्मिता’ मालिकेच्या सेटवरून सुरू झालेलं त्यांचं नातं थेट विवाहापर्यंत पोहोचलं, मात्र अवघ्या दोन वर्षांतच त्यांच्या संसाराला पूर्णविराम मिळाला.


सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. तेव्हा मयुरीने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक अनकव्हर गोष्टी उघडपणे मांडल्या.


"लग्नाचा निर्णय घेताना फार विचार केला नाही..."


मयुरीने सांगितलं की, त्या काळात तिने लग्नाचा निर्णय अतिशय घाईत घेतला होता. आजच्या पिढीप्रमाणे जोडीदाराची आर्थिक स्थिरता, कुटुंबाची पार्श्वभूमी, विचारसरणी या बाबींचा विचार करण्याऐवजी, ती प्रेमाच्या प्रवाहात वाहत गेली. “आज मुली खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. पण, मी तसं केलं नाही. माझं लग्न हा एक प्रवाह होता आणि मी त्यात वाहून गेले,” असं ती म्हणाली.


"आई-वडिलांनी माझा निर्णय स्वीकारला, पण..."


तिच्या निर्णयामागे तिच्या आईवडिलांचा पाठिंबा होता, पण त्यांच्या मनात शंका असल्याचेही तिने नमूद केलं. “आई-बाबांनी मला थांबवलं नाही, पण त्यांना आतून वाटत होतं की काहीतरी चुकतंय,” असं ती म्हणाली.


"सहा महिन्यांत कळलं होतं की हे नातं टिकणार नाही..."


मयुरीच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या काही महिन्यांतच तिच्या लक्षात आलं होतं की काहीतरी बिनसतंय. मात्र, ते स्वीकारायला आणि निर्णय घ्यायला दीड वर्ष लागलं. तिच्या आईवडिलांना ही गोष्ट फार आधीच समजली होती, पण मयुरीला हे समजायला वेळ लागला.


"शारीरिक छळ झालाय" – धक्कादायक खुलासा


या मुलाखतीत तिने पहिल्यांदाच सांगितलं की, त्या नात्यात तिला शारीरिक त्रास सहन करावा लागला. “या गोष्टी सहन करायला शिकवलं जातं, पण कधी थांबायचं हे कोणीच शिकवत नाही,” असं ती स्पष्टपणे म्हणाली.


"कोणावरही पुन्हा विश्वास ठेवायचा नाही"


“जेव्हा मी खूप भावनिक स्थितीत होते, तेव्हा मला कोणाचाच आधार नव्हता. मासे आणून त्यांच्याशी बोलायचे, कारण कोणाला सांगण्यासारखी मनस्थिती नव्हती. सेटवर शूटिंग करत होते, पण मनात फार गोंधळ होता. अनेकदा सहकलाकार माझ्यासोबत रात्रभर बसायचे, कारण मला झोप येत नसे,” असं सांगताना ती visibly भावूक झाली.


"सहानुभूती नको, फक्त सत्य सांगायचं होतं"


मयुरी म्हणाली की, तिच्या या कथनातून सहानुभूती मिळवण्याचा हेतू नाही, पण अनेक मुली अशा परिस्थितीतून जात असतात, आणि त्या वेळेवर निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणूनच तिचं बोलणं इतरांसाठी आरशासारखं ठरू शकतं.


"पुन्हा सुरुवात केली, पण अनुभव विसरता आला नाही"


या सर्व प्रसंगानंतर मयुरीने स्वतःला सावरलं. 'ती फुलराणी'सारख्या प्रोजेक्टमुळे तिला मानसिक आधार मिळाला. आता ती अधिक सशक्तपणे जगतेय, आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहतेय.

Comments
Add Comment

Aamir Khan's Third Marriage : तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आमिर खान? गौरी स्प्रॅटसोबत सीक्रेट वेडिंग?

मुंबई (Aamir Khan's Third Marriage) : बॉलिवूडचा 'PK' आमिर खान (Aamir Khan) तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. अनेक

Ranveer Singh : FWICE चा यू-टर्न! रणवीर सिंगवरील कारवाई मागे घेतल्याची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि 'डॉन 3' (Don-3) चित्रपटाच्या वादावरून सुरू झालेल्या संघर्षात मोठी घडामोड

Vaibhav Mangle Social Media Post : सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतर वैभव मांगले भावुक; 'त्यांच्या प्रतिभेला हवी तशी दाद मिळाली नाही'

मुंबई : सुमन कल्याणपूर यांच्या निधनानंतर मराठी अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangle) यांनी भावुक पोस्ट (Post) शेअर करत त्यांना

Salman Khan : ‘काळा हिरण’ सिनेमावर सलमान खानचा आक्षेप; निर्मात्यांना थेट पाठवली कायदेशीर नोटीस

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या आगामी चित्रपटामुळे नव्हे, तर एका

Deool Band 2 box office collection : 'देऊळ बंद २'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; १२ दिवसांत केली 'इतक्या' कोटींची कमाई

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगली कमाई करताना दिसत

विश्वासात घेतलं, घरात प्रवेश मिळवला अन् 25 लाखांचा डल्ला! अभिनेत्री रवीना टंडनच्या कुटुंबाला मोठा धक्का

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कुटुंबाचा विश्वास