"त्या काळात खूप काही सहन केलं, माझा शारीरिक... मयुरी वाघचा पियुष रानडे सोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांवर, विशेषतः पती पियुष रानडेसोबतच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अस्मिता’ मालिकेच्या सेटवरून सुरू झालेलं त्यांचं नातं थेट विवाहापर्यंत पोहोचलं, मात्र अवघ्या दोन वर्षांतच त्यांच्या संसाराला पूर्णविराम मिळाला.


सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. तेव्हा मयुरीने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक अनकव्हर गोष्टी उघडपणे मांडल्या.


"लग्नाचा निर्णय घेताना फार विचार केला नाही..."


मयुरीने सांगितलं की, त्या काळात तिने लग्नाचा निर्णय अतिशय घाईत घेतला होता. आजच्या पिढीप्रमाणे जोडीदाराची आर्थिक स्थिरता, कुटुंबाची पार्श्वभूमी, विचारसरणी या बाबींचा विचार करण्याऐवजी, ती प्रेमाच्या प्रवाहात वाहत गेली. “आज मुली खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. पण, मी तसं केलं नाही. माझं लग्न हा एक प्रवाह होता आणि मी त्यात वाहून गेले,” असं ती म्हणाली.


"आई-वडिलांनी माझा निर्णय स्वीकारला, पण..."


तिच्या निर्णयामागे तिच्या आईवडिलांचा पाठिंबा होता, पण त्यांच्या मनात शंका असल्याचेही तिने नमूद केलं. “आई-बाबांनी मला थांबवलं नाही, पण त्यांना आतून वाटत होतं की काहीतरी चुकतंय,” असं ती म्हणाली.


"सहा महिन्यांत कळलं होतं की हे नातं टिकणार नाही..."


मयुरीच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या काही महिन्यांतच तिच्या लक्षात आलं होतं की काहीतरी बिनसतंय. मात्र, ते स्वीकारायला आणि निर्णय घ्यायला दीड वर्ष लागलं. तिच्या आईवडिलांना ही गोष्ट फार आधीच समजली होती, पण मयुरीला हे समजायला वेळ लागला.


"शारीरिक छळ झालाय" – धक्कादायक खुलासा


या मुलाखतीत तिने पहिल्यांदाच सांगितलं की, त्या नात्यात तिला शारीरिक त्रास सहन करावा लागला. “या गोष्टी सहन करायला शिकवलं जातं, पण कधी थांबायचं हे कोणीच शिकवत नाही,” असं ती स्पष्टपणे म्हणाली.


"कोणावरही पुन्हा विश्वास ठेवायचा नाही"


“जेव्हा मी खूप भावनिक स्थितीत होते, तेव्हा मला कोणाचाच आधार नव्हता. मासे आणून त्यांच्याशी बोलायचे, कारण कोणाला सांगण्यासारखी मनस्थिती नव्हती. सेटवर शूटिंग करत होते, पण मनात फार गोंधळ होता. अनेकदा सहकलाकार माझ्यासोबत रात्रभर बसायचे, कारण मला झोप येत नसे,” असं सांगताना ती visibly भावूक झाली.


"सहानुभूती नको, फक्त सत्य सांगायचं होतं"


मयुरी म्हणाली की, तिच्या या कथनातून सहानुभूती मिळवण्याचा हेतू नाही, पण अनेक मुली अशा परिस्थितीतून जात असतात, आणि त्या वेळेवर निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणूनच तिचं बोलणं इतरांसाठी आरशासारखं ठरू शकतं.


"पुन्हा सुरुवात केली, पण अनुभव विसरता आला नाही"


या सर्व प्रसंगानंतर मयुरीने स्वतःला सावरलं. 'ती फुलराणी'सारख्या प्रोजेक्टमुळे तिला मानसिक आधार मिळाला. आता ती अधिक सशक्तपणे जगतेय, आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहतेय.

Comments
Add Comment

Samay Raina : सर्वोच्च न्यायालयाने समय रैनाला ठोठावली ३ लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना यांना त्यांच्या 'इंडियाज गॉट लेटंट'(India's Got Latent)

Ranveer Singh: 'प्रलय'च्या शूटिंगनंतर रणवीर सिंग घेणार विश्रांती; ब्रेकचे नेमकं कारण आलं समोर 

शुटिंग संपताच रणवीर सिंग घेणार ब्रेक बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील

Chhaya Kadam : सलग साडेतीन तास एकाच जागी... हलताही येईना! भूतम भयम्' मधील छाया कदम यांच्या 'जठाई' लूकची जोरदार चर्चा!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या 'भूतम भयम्' या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपटाची तुफान हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा

'Lock Up 2' Riteish Deshmukh : रितेश देशमुखचा संयम सुटला! 'लॉक अप 2'च्या सेटवर स्पर्धकावर भडकला, VIDEO चर्चेत

मुंबई : एकता कपूरचा (Ekta Kapoor) लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो (Reality Show) 'लॉक अप 2' (Lock Upp 2) दिवसेंदिवस अधिक चर्चेत येत आहे. या सीझनमध्ये

Smriti & Palash controversy : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या प्रकरणात नव्हे वळण ; पलाश मुच्छलला होणार अटक ?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील सुप्रसिद्ध खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि संगीत क्षेत्रातील गायक पलाश मुच्छल(Palash

Lock Up 2 : गोविंदासमोर सुनीता आहुजाची भावनिक एक्झिट; 'लॉक अप २'मध्ये घडला अनपेक्षित क्षण

Lock Up 2 : 'लॉक अप २' (Lock Up 2 ) या रिअॅलिटी शोमध्ये अभिनेत्री सुनीता आहुजाचा (Sunita Ahuja) प्रवास संपला असून, तिच्या एक्झिटदरम्यान