"त्या काळात खूप काही सहन केलं, माझा शारीरिक... मयुरी वाघचा पियुष रानडे सोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांवर, विशेषतः पती पियुष रानडेसोबतच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अस्मिता’ मालिकेच्या सेटवरून सुरू झालेलं त्यांचं नातं थेट विवाहापर्यंत पोहोचलं, मात्र अवघ्या दोन वर्षांतच त्यांच्या संसाराला पूर्णविराम मिळाला.


सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. तेव्हा मयुरीने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक अनकव्हर गोष्टी उघडपणे मांडल्या.


"लग्नाचा निर्णय घेताना फार विचार केला नाही..."


मयुरीने सांगितलं की, त्या काळात तिने लग्नाचा निर्णय अतिशय घाईत घेतला होता. आजच्या पिढीप्रमाणे जोडीदाराची आर्थिक स्थिरता, कुटुंबाची पार्श्वभूमी, विचारसरणी या बाबींचा विचार करण्याऐवजी, ती प्रेमाच्या प्रवाहात वाहत गेली. “आज मुली खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. पण, मी तसं केलं नाही. माझं लग्न हा एक प्रवाह होता आणि मी त्यात वाहून गेले,” असं ती म्हणाली.


"आई-वडिलांनी माझा निर्णय स्वीकारला, पण..."


तिच्या निर्णयामागे तिच्या आईवडिलांचा पाठिंबा होता, पण त्यांच्या मनात शंका असल्याचेही तिने नमूद केलं. “आई-बाबांनी मला थांबवलं नाही, पण त्यांना आतून वाटत होतं की काहीतरी चुकतंय,” असं ती म्हणाली.


"सहा महिन्यांत कळलं होतं की हे नातं टिकणार नाही..."


मयुरीच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या काही महिन्यांतच तिच्या लक्षात आलं होतं की काहीतरी बिनसतंय. मात्र, ते स्वीकारायला आणि निर्णय घ्यायला दीड वर्ष लागलं. तिच्या आईवडिलांना ही गोष्ट फार आधीच समजली होती, पण मयुरीला हे समजायला वेळ लागला.


"शारीरिक छळ झालाय" – धक्कादायक खुलासा


या मुलाखतीत तिने पहिल्यांदाच सांगितलं की, त्या नात्यात तिला शारीरिक त्रास सहन करावा लागला. “या गोष्टी सहन करायला शिकवलं जातं, पण कधी थांबायचं हे कोणीच शिकवत नाही,” असं ती स्पष्टपणे म्हणाली.


"कोणावरही पुन्हा विश्वास ठेवायचा नाही"


“जेव्हा मी खूप भावनिक स्थितीत होते, तेव्हा मला कोणाचाच आधार नव्हता. मासे आणून त्यांच्याशी बोलायचे, कारण कोणाला सांगण्यासारखी मनस्थिती नव्हती. सेटवर शूटिंग करत होते, पण मनात फार गोंधळ होता. अनेकदा सहकलाकार माझ्यासोबत रात्रभर बसायचे, कारण मला झोप येत नसे,” असं सांगताना ती visibly भावूक झाली.


"सहानुभूती नको, फक्त सत्य सांगायचं होतं"


मयुरी म्हणाली की, तिच्या या कथनातून सहानुभूती मिळवण्याचा हेतू नाही, पण अनेक मुली अशा परिस्थितीतून जात असतात, आणि त्या वेळेवर निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणूनच तिचं बोलणं इतरांसाठी आरशासारखं ठरू शकतं.


"पुन्हा सुरुवात केली, पण अनुभव विसरता आला नाही"


या सर्व प्रसंगानंतर मयुरीने स्वतःला सावरलं. 'ती फुलराणी'सारख्या प्रोजेक्टमुळे तिला मानसिक आधार मिळाला. आता ती अधिक सशक्तपणे जगतेय, आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहतेय.

Comments
Add Comment

Bigg Boss Marathi Season 6: पहिल्याच 'भाऊच्या धक्क्या"वर रितेश देशमुख घेणार तन्वी आणि रुचितासोबत इतर सदस्यांची शाळा!

"तन्वी तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन!" - रितेश देशमुख "रुचिता जामदार महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला पंजा

आठवणीतला गोडवा

राज चिंचणकर, राजरंग मकरसंक्रांती आणि गोडवा, हे समीकरण अतूट आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुरू

हे नाटक चालू शकतं? लागली पैज...

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आमच्या पिढीला, करीअर करायला निघालेल्या नवरा बायकोमध्ये वितुष्ट आले की पहिल्यांदा

PIFF : 'थर्ड आय एशियन'नंतर 'गमन' आता 'पिफ'मध्ये, पाहायला मिळणार स्थलांतराचा अनोखा अनुभव

मुंबई : स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील