"त्या काळात खूप काही सहन केलं, माझा शारीरिक... मयुरी वाघचा पियुष रानडे सोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांवर, विशेषतः पती पियुष रानडेसोबतच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अस्मिता’ मालिकेच्या सेटवरून सुरू झालेलं त्यांचं नातं थेट विवाहापर्यंत पोहोचलं, मात्र अवघ्या दोन वर्षांतच त्यांच्या संसाराला पूर्णविराम मिळाला.


सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. तेव्हा मयुरीने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक अनकव्हर गोष्टी उघडपणे मांडल्या.


"लग्नाचा निर्णय घेताना फार विचार केला नाही..."


मयुरीने सांगितलं की, त्या काळात तिने लग्नाचा निर्णय अतिशय घाईत घेतला होता. आजच्या पिढीप्रमाणे जोडीदाराची आर्थिक स्थिरता, कुटुंबाची पार्श्वभूमी, विचारसरणी या बाबींचा विचार करण्याऐवजी, ती प्रेमाच्या प्रवाहात वाहत गेली. “आज मुली खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. पण, मी तसं केलं नाही. माझं लग्न हा एक प्रवाह होता आणि मी त्यात वाहून गेले,” असं ती म्हणाली.


"आई-वडिलांनी माझा निर्णय स्वीकारला, पण..."


तिच्या निर्णयामागे तिच्या आईवडिलांचा पाठिंबा होता, पण त्यांच्या मनात शंका असल्याचेही तिने नमूद केलं. “आई-बाबांनी मला थांबवलं नाही, पण त्यांना आतून वाटत होतं की काहीतरी चुकतंय,” असं ती म्हणाली.


"सहा महिन्यांत कळलं होतं की हे नातं टिकणार नाही..."


मयुरीच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या काही महिन्यांतच तिच्या लक्षात आलं होतं की काहीतरी बिनसतंय. मात्र, ते स्वीकारायला आणि निर्णय घ्यायला दीड वर्ष लागलं. तिच्या आईवडिलांना ही गोष्ट फार आधीच समजली होती, पण मयुरीला हे समजायला वेळ लागला.


"शारीरिक छळ झालाय" – धक्कादायक खुलासा


या मुलाखतीत तिने पहिल्यांदाच सांगितलं की, त्या नात्यात तिला शारीरिक त्रास सहन करावा लागला. “या गोष्टी सहन करायला शिकवलं जातं, पण कधी थांबायचं हे कोणीच शिकवत नाही,” असं ती स्पष्टपणे म्हणाली.


"कोणावरही पुन्हा विश्वास ठेवायचा नाही"


“जेव्हा मी खूप भावनिक स्थितीत होते, तेव्हा मला कोणाचाच आधार नव्हता. मासे आणून त्यांच्याशी बोलायचे, कारण कोणाला सांगण्यासारखी मनस्थिती नव्हती. सेटवर शूटिंग करत होते, पण मनात फार गोंधळ होता. अनेकदा सहकलाकार माझ्यासोबत रात्रभर बसायचे, कारण मला झोप येत नसे,” असं सांगताना ती visibly भावूक झाली.


"सहानुभूती नको, फक्त सत्य सांगायचं होतं"


मयुरी म्हणाली की, तिच्या या कथनातून सहानुभूती मिळवण्याचा हेतू नाही, पण अनेक मुली अशा परिस्थितीतून जात असतात, आणि त्या वेळेवर निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणूनच तिचं बोलणं इतरांसाठी आरशासारखं ठरू शकतं.


"पुन्हा सुरुवात केली, पण अनुभव विसरता आला नाही"


या सर्व प्रसंगानंतर मयुरीने स्वतःला सावरलं. 'ती फुलराणी'सारख्या प्रोजेक्टमुळे तिला मानसिक आधार मिळाला. आता ती अधिक सशक्तपणे जगतेय, आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहतेय.

Comments
Add Comment

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज आपल्या वाढदिवसाच्या

वर्षा उसगावकर पुन्हा छोट्या पडद्यावर; दिसणार 'या' लोकप्रिय मालिकेत

मराठी सिनेविश्वातील एव्हर ग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आता स्टार प्रवाहवरच्या मालिकेत दिसणार आहेत. वर्षा

धुरंधरलाही या चित्रपटाने टाकलं मागे, पहिल्याच आठवड्यात कमवले १०० कोटी

भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात रचला इतिहास सध्या सगळीकडेच धुरंधर हा चित्रपट फेमस झाला

Shilpa Shetty...शिल्पा शेट्टी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, AI मॉर्फ कंटेंटवर बंदी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा गैरवापर सर्रासपणे केला जातो. मागील काही दिवसात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील

भाईजानचे साठीत पदार्पण! वाढदिवसानिमित्त वांद्रे-वरळी सिलिंक खास रोषणाई

मुंबई: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने साठीमध्ये पदार्पण केले आहे. सलमान आज त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करणार

शॉर्टमध्ये सांगितलेली बेकेट थिअरी

भालचंद्र कुबल, पाचवा वेद हल्ली अँटीसिपेटेड कथानकांचा एवढा कंटाळा आलाय ना की समजा नाटक बघताना तुमच्या बाजूच्या