"त्या काळात खूप काही सहन केलं, माझा शारीरिक... मयुरी वाघचा पियुष रानडे सोबतच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा!

मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री मयुरी वाघ हिने अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षांवर, विशेषतः पती पियुष रानडेसोबतच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ‘अस्मिता’ मालिकेच्या सेटवरून सुरू झालेलं त्यांचं नातं थेट विवाहापर्यंत पोहोचलं, मात्र अवघ्या दोन वर्षांतच त्यांच्या संसाराला पूर्णविराम मिळाला.


सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. तेव्हा मयुरीने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक अनकव्हर गोष्टी उघडपणे मांडल्या.


"लग्नाचा निर्णय घेताना फार विचार केला नाही..."


मयुरीने सांगितलं की, त्या काळात तिने लग्नाचा निर्णय अतिशय घाईत घेतला होता. आजच्या पिढीप्रमाणे जोडीदाराची आर्थिक स्थिरता, कुटुंबाची पार्श्वभूमी, विचारसरणी या बाबींचा विचार करण्याऐवजी, ती प्रेमाच्या प्रवाहात वाहत गेली. “आज मुली खूप विचारपूर्वक निर्णय घेतात. पण, मी तसं केलं नाही. माझं लग्न हा एक प्रवाह होता आणि मी त्यात वाहून गेले,” असं ती म्हणाली.


"आई-वडिलांनी माझा निर्णय स्वीकारला, पण..."


तिच्या निर्णयामागे तिच्या आईवडिलांचा पाठिंबा होता, पण त्यांच्या मनात शंका असल्याचेही तिने नमूद केलं. “आई-बाबांनी मला थांबवलं नाही, पण त्यांना आतून वाटत होतं की काहीतरी चुकतंय,” असं ती म्हणाली.


"सहा महिन्यांत कळलं होतं की हे नातं टिकणार नाही..."


मयुरीच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या काही महिन्यांतच तिच्या लक्षात आलं होतं की काहीतरी बिनसतंय. मात्र, ते स्वीकारायला आणि निर्णय घ्यायला दीड वर्ष लागलं. तिच्या आईवडिलांना ही गोष्ट फार आधीच समजली होती, पण मयुरीला हे समजायला वेळ लागला.


"शारीरिक छळ झालाय" – धक्कादायक खुलासा


या मुलाखतीत तिने पहिल्यांदाच सांगितलं की, त्या नात्यात तिला शारीरिक त्रास सहन करावा लागला. “या गोष्टी सहन करायला शिकवलं जातं, पण कधी थांबायचं हे कोणीच शिकवत नाही,” असं ती स्पष्टपणे म्हणाली.


"कोणावरही पुन्हा विश्वास ठेवायचा नाही"


“जेव्हा मी खूप भावनिक स्थितीत होते, तेव्हा मला कोणाचाच आधार नव्हता. मासे आणून त्यांच्याशी बोलायचे, कारण कोणाला सांगण्यासारखी मनस्थिती नव्हती. सेटवर शूटिंग करत होते, पण मनात फार गोंधळ होता. अनेकदा सहकलाकार माझ्यासोबत रात्रभर बसायचे, कारण मला झोप येत नसे,” असं सांगताना ती visibly भावूक झाली.


"सहानुभूती नको, फक्त सत्य सांगायचं होतं"


मयुरी म्हणाली की, तिच्या या कथनातून सहानुभूती मिळवण्याचा हेतू नाही, पण अनेक मुली अशा परिस्थितीतून जात असतात, आणि त्या वेळेवर निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणूनच तिचं बोलणं इतरांसाठी आरशासारखं ठरू शकतं.


"पुन्हा सुरुवात केली, पण अनुभव विसरता आला नाही"


या सर्व प्रसंगानंतर मयुरीने स्वतःला सावरलं. 'ती फुलराणी'सारख्या प्रोजेक्टमुळे तिला मानसिक आधार मिळाला. आता ती अधिक सशक्तपणे जगतेय, आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहतेय.

Comments
Add Comment

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी