जगात २८ कोटी लोक नैराश्यात


 दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी ’जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल जागरूक करणे हा आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन हा शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून देणारा दिवस आहे. जगात सुमारे १५ टक्के लोक मानसिक समस्यांनी त्रस्त आहेत. एंग्झायटी आणि डिप्रेशन या सर्वात सामान्य मानसिक आरोग्य समस्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगात प्रत्येक ७ पैकी १ व्यक्ती या विकाराने त्रस्त आहे.


सुमारे २८ कोटींहून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या एंग्झायटी डिसऑर्डरने त्रस्त आहेत. एंग्झायटीमध्ये व्यक्तीला अतिशय चिंता, भीती आणि तणावाची भावना येते. ही स्थिती सर्व वयोगटातील लोकांमध्ये आढळते. डिप्रेशन आणि एंग्झायटीवर उपचार शक्य आहेत. यामध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, औषधे आणि जीवनशैलीत बदल यांची गरज असते. योग्य सल्ला आणि उपचाराने व्यक्ती आपल्या जीवनात पुन्हा आनंद मिळवू शकते. ध्यान, योग, शारीरिक व्यायाम आणि सकारात्मक विचार हेदेखील मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात.


मानसिक आजाराचा परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही, तर त्यांच्या कुटुंबावर आणि समाजावरही होतो. यामुळे नात्यांमध्ये तणाव आणि सामाजिक अंतर वाढते. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त यावर जोर दिला जातो की, मानसिक आजाराला एका आजाराप्रमाणे स्वीकारावे आणि वेळेवर उपचार घ्यावेत.



Comments
Add Comment

Ai Education : भारत घेणार तंत्रज्ञानाची नवी झेप, तिसऱ्या इयत्तेपासून कॉम्प्युटर नव्हे, आता 'AI' चा धडा! कधीपासून शिकवलं जाणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : भारतातील शिक्षण क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा बदल लवकरच होणार आहे.

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार