म्हाडाला अर्जाच्या विक्रीतून मिळाले ८ कोटी

मुंबई (प्रतिनिधी) : म्हाडाच्या कोकण मंडळांच्या घरांसाठी येत्या शनिवारी दि. ११ ऑक्टोबरला ठाण्यामध्ये संगणकीय सोडत होणार आहे. मात्र या सोडतीपूर्वीच म्हाडा मालामाल झाली आहे. केवळ अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने तब्बल ८ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे. तसेच शासनालादेखील जीएसटीच्या माध्यमातून १ कोटी ४२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.


म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३५४ घरांच्या आणि सिंधुदुर्ग जिह्यातील ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता जुलैमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. या सोडतीसाठी एकूण १ लाख ८४ हजार ९९४ अर्ज आले असून अनामत रकमेसह १ लाख ५८ हजार ४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. अनामत रकमेसह भरलेले अर्ज सोडतीसाठी पात्र ठरतात. घरांसाठी अर्ज भरताना म्हाडा अर्जदाराकडून अनामत रकमेसह ५९० रुपये चार्ज आकारते. यात ५०० रुपये अर्ज शुल्क आणि ९० रुपये जीएसटीचा समावेश असतो. अर्ज शुल्काचे ५०० रुपये म्हाडाला मिळतात. अशा प्रकारे १लाख ५८ हजार ४२४ अर्जाच्या विक्रीतून म्हाडाने ७ कोटी ९२ लाखांची कमाई केली आहे.


तसेच प्रतिअर्ज ९० रुपये जीएसटीच्या माध्यमातून १ कोटी ४२ लाख ५८ हजार रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. म्हाडाकडून अत्यल्प उत्पन्न गटाच्या अर्जदाराकडून ५ हजार रुपये, अल्प उत्पन्न गटाकडून १० हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटाकडून १५ हजार रुपये तर उच्च उत्पन्न गटाकडून २० हजार रुपये आकारले जातात. अशा प्रकारे अनामत रकमेतून म्हाडाच्या तिजोरीत दीडशे कोटी रुपये जमा झाले आहेत. लॉटरीत अयशस्वी झालेल्या अर्जदारांना अर्ज शुल्क वगळून अनामत रक्कम परत केली जाते तर यशस्वी अर्जदारांच्या फ्लॅटच्या किमतीमधून अनामत रक्कम वजा केली जाते.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत