श्रीवर्धन डेपोच्या बसगाड्यांचे अतिरिक्त थांबे रद्द करा

श्रीवर्धन (वार्ताहर) : श्रीवर्धन डेपोच्या बसला गोवा हायवेवरील सर्व थांबे देत असल्याने स्थानिक प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पनवेल व वडखळ बस स्थानकातून महामार्गावरील स्थानिक प्रवासी बसमध्ये चढत असल्याने श्रीवर्धन म्हसळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना उभे राहून किंवा इतर आगाराच्या बसने प्रवास करावा लागतो.


गाड्यांमध्ये आधीच प्रचंड गर्दी असताना देखील हायवेच्या थांब्यांवरील प्रवासी घेतले जातात. यामुळे श्रीवर्धनच्या प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरत असून त्यात महिलांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रवाशांमध्ये किरकोळ वाद सुद्धा निर्माण होतात. पनवेल पेन, पनवेल माणगाव, पनवेल महाड या बस विनावाहक विना थांबा चालवण्यात येतात. त्यामुळे या क्षेत्रातील स्थानिक प्रवाशांची जबाबदारी फक्त श्रीवर्धन आगारानेच का उचलावी? असा प्रश्न नागरिकांना उपस्थित केला आहे. आधीच दोन आगारातील अंतर जवळपास ६३ किमी तसेच २ तालुक्यातील प्रवाशांची जबाबदारी एकट्या श्रीवर्धन आगारावर असताना श्रीवर्धन आगारावर महामार्गावरील लोकल थांब्यांची जबाबदारी का टाकण्यात येते.


त्यामुळे श्रीवर्धन बस स्थानकाला अतिरिक्त देण्यात आलेले लोकल बसथांबे बंद करून न्याय द्यावा, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून महामंडळाकडे करण्यात येत आहे. श्रीवर्धन डेपोच्या बसगाड्या फक्त नियोजित थांब्यांवरच थांबाव्यात. यामुळे श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील स्थानिक प्रवाशांना आरामदायक व सुरक्षित तसेच आपल्या गावच्या बसने प्रवास करता येईल. त्यामुळे वेळ व पैशांची बचत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित