बदली आदेशानंतरही ठामपाचे १७० कर्मचारी त्याच विभागात

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेचा अनागोंदी कारभार वारंवार उघड होत आहे. ठामपाच्या अतिक्रमण विभागातील १७० कर्मचाऱ्यांची अन्य विभागांमध्ये बदली करण्यास चालढकल केली जात आहे. या प्रकरणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन या कर्मचाऱ्यांची बदलीची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. २०२१ मध्ये बदलीचा आदेश दिल्यानंतरही महिनाभरात संबंधित कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागातच दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागातील वर्षानुवर्षांच्या भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर बदलीच्या कडक कारवाईची आवश्यकता आहे.


ठामपाचा ४३ वा वर्धापन दिन १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. याच दिवशी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाखांची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यांनी ५० लाखांची मागणी केली होती. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यांना २ ऑक्टोबरपासून सेवेतून निलंबित केले. त्यामुळे ठाण्याची बदनामी झाली. ठाणे म्हणजे विकास, आघाडीचे शहर या प्रतिमेला काळीमा फासला गेला. महापालिकांमध्ये ठाणे शहराचा नावलौकिक होत असतानाच, पाटोळेंमुळे शहराच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला गेला, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, असे नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे.


महापालिकेत अतिक्रमण विभागाप्रमाणेच शहर विकास, घनकचरा, सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्वाच्या पदांवरही काही अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. त्यांच्याही बदल्या लवकरात लवकर करण्याची गरज आहे, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. ठामपाच्या तत्कालीन आयुक्तांनी ८ ऑक्टोबर २०२१ रोजी पालिकेच्या अतिक्रमण विभागातील १७० कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली केली होती. मात्र, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत त्या १७० कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत समाऊन घेण्यात आले. या प्रकाराची आपण चौकशी करावी.


तसेच सध्या ते १७० कर्मचारी कुठे काम करीत आहेत, याची आपण माहिती घ्यावी. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हितसंबंध निर्माण झाले असून, त्यामुळे शहरात अतिक्रमणे वाढत आहे. या कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांची अन्य विभागात बदली करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून

Ulhasnagar Lizard In Manchurian : उल्हासनगरात धक्कादायक प्रकार! मंचुरियनमध्ये पालीचे पिल्लू

मुंबई : अन्नसुरक्षेचा (Food Safety) गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये एका चायनीज सेंटरमधून (Chinese Centre)

Ambernath News: डॉक्टर पतीचा 'तो' त्रास असाह्य; लग्नाच्या दीड महिन्यात नवविवाहितेची आत्महत्या

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambernath) एका २६ वर्षीय नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)

Yamdut Campaign : दिवा स्थानकात रेल्वे पोलिसांची अनोखी ‘यमदूत’ मोहीम; रुळ ओलांडणाऱ्यांचे प्रबोधन

ठाणे: रेल्वे रुळ ओलांडण्याच्या धोकादायक सवयीला आळा घालण्यासाठी आणि वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी ठाणे रेल्वे

Thane News: 4 वर्षीय चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे वाचले बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण; ठाणे वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई

ठाणे : चिमुकल्याच्या प्रसंगावधानामुळे आणि ठाणे वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे एका बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण

Thane Accident : शहापूर-मुरबाड मार्गावर मिनी बसचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, तीन प्रवासी गंभीर जखमी

ठाणे : शहापूर-मुरबाड (Shahapur-Murbad) मार्गावरील शेंद्रुण परिसरात सोमवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मिनी बस (Mini Bus Accident)