बदली आदेशानंतरही ठामपाचे १७० कर्मचारी त्याच विभागात

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेचा अनागोंदी कारभार वारंवार उघड होत आहे. ठामपाच्या अतिक्रमण विभागातील १७० कर्मचाऱ्यांची अन्य विभागांमध्ये बदली करण्यास चालढकल केली जात आहे. या प्रकरणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र देऊन या कर्मचाऱ्यांची बदलीची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. २०२१ मध्ये बदलीचा आदेश दिल्यानंतरही महिनाभरात संबंधित कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागातच दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागातील वर्षानुवर्षांच्या भ्रष्टाचाराची साखळी मोडून काढण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर बदलीच्या कडक कारवाईची आवश्यकता आहे.


ठामपाचा ४३ वा वर्धापन दिन १ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. याच दिवशी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना २५ लाखांची लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यांनी ५० लाखांची मागणी केली होती. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यांना २ ऑक्टोबरपासून सेवेतून निलंबित केले. त्यामुळे ठाण्याची बदनामी झाली. ठाणे म्हणजे विकास, आघाडीचे शहर या प्रतिमेला काळीमा फासला गेला. महापालिकांमध्ये ठाणे शहराचा नावलौकिक होत असतानाच, पाटोळेंमुळे शहराच्या प्रतिष्ठेला काळीमा फासला गेला, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, असे नारायण पवार यांनी पत्रात म्हटले आहे.


महापालिकेत अतिक्रमण विभागाप्रमाणेच शहर विकास, घनकचरा, सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्वाच्या पदांवरही काही अधिकारी आणि कर्मचारी वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. त्यांच्याही बदल्या लवकरात लवकर करण्याची गरज आहे, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. ठामपाच्या तत्कालीन आयुक्तांनी ८ ऑक्टोबर २०२१ रोजी पालिकेच्या अतिक्रमण विभागातील १७० कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली केली होती. मात्र, एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत त्या १७० कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत समाऊन घेण्यात आले. या प्रकाराची आपण चौकशी करावी.


तसेच सध्या ते १७० कर्मचारी कुठे काम करीत आहेत, याची आपण माहिती घ्यावी. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हितसंबंध निर्माण झाले असून, त्यामुळे शहरात अतिक्रमणे वाढत आहे. या कर्मचाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांची अन्य विभागात बदली करावी, अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके

Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या

Dombivli News : कोट्यवधींच्या प्रकल्पामुळे ५० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ; डोंबिवलीतील दोन इमारती धोक्यात

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आणि एका खासगी कंपनीच्या