शेतकऱ्याच्या ४ लाखांच्या चेक घोटाळ्याची पोलिसांत नोंद, बँक ऑफ महाराष्ट्रच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांच्या ४ लाख रुपयांच्या चेकचोरी प्रकरणात अखेर बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोलापूर नवी पेठ शाखेकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोयाबीन विकून कंपनीकडून मिळालेला चेक त्यांनी बँकेच्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकला होता. मात्र, तो चेक एका व्यक्तीने फसवणूक करत चोरून त्याच्या खात्यावर पैसे वळते केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.


या प्रकरणात अमर तेपेदार या व्यक्तीने बँकेच्या कर्मचाऱ्यांना फसवून ड्रॉप बॉक्स उघडायला लावल्याचा आरोप आहे. त्याने "स्लिपवर खाते क्रमांक चुकीचा टाकला आहे" असे सांगून बँक कर्मचाऱ्यांची नजर चुकवून चेक चोरल्याची तक्रार बँकेने पोलिसांकडे दिली आहे. हा चेक नंतर दुसऱ्याच खात्यात जमा झाला आणि शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा न झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.


शेतकरी उत्तम जाधव गेल्या आठवड्यापासून बँकेत फेऱ्या मारत होते, मात्र बँक त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेत नव्हती. त्यांना सतत दुर्लक्षित केले जात होते. अखेर प्रसारमाध्यमांमध्ये बातमी झळकल्यानंतर बँकेला जाग आली आणि त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.


या प्रकारामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून, बँकेच्या निष्काळजीपणामुळे सामान्य ग्राहकांची सुरक्षितता धोक्यात येत असल्याचे चित्र समोर आले आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Comments
Add Comment

कागलमध्ये ३५७.९९ कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,