हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल वाढला आहे. या प्रवाहात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, चित्रपटाच्या नावावरूनच वाद सुरू झाला आहे. यामुळे याच नावाने चित्रपट प्रदर्शित होईल की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांनी चित्रपटाच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. ‘मनाचे श्लोक’ हे रामदास स्वामींनी लिहिले होते. मनावर चांगले संस्कार व्हावे या हेतूने ही रचना रामदास स्वामींनी केली होती. आजही महाराष्ट्रात अनेक विद्यार्थी मनाचे श्लोक म्हणतात, अशा वेळी ‘मनाचे श्लोक’ या नावाचा वापर मनोरंजनासाठी करणे अयोग्य वाटते; अशी भावना मंडळाने व्यक्त केली आहे. त्यांनी चित्रपट निर्मात्यांकडे नाव बदलण्याची मागणी केली असून, ती मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.


हा चित्रपट मानवी नातेसंबंध, प्रेम, लग्न यांसारख्या भावनिक विषयांवर आधारित असून, मृण्मयी देशपांडेने दिग्दर्शन आणि लेखनाचे काम सांभाळले आहे. मृण्मयीसोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब, तसेच लीना भागवत, मंगेश कदम आणि शुभांगी गोखले हे कलाकार झळकणार आहेत.


चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याची चर्चा रंगली होती. मृण्मयीने यामधील कथानकाबाबत बोलताना सांगितले की, ‘मनाचे श्लोक’ ही गोष्ट आहे ‘मनवा’ आणि ‘श्लोक’ या दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणारी. त्यांच्या नात्यातून प्रेक्षकांना अनेक ओळखीच्या भावना आणि विचारांचा प्रत्यय येईल.


सध्या चित्रपटाच्या नावावरून उठलेल्या या वादावर चित्रपटाच्या टीमकडून अथवा मृण्मयी देशपांडे हिच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि त्याआधी या नावाच्या मुद्यावर तोडगा न निघाल्यास चित्रपट प्रदर्शनाचे नियोजन अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता

पनवेलकरांसाठी २३ नोव्हेंबरला पीव्हीआरमध्ये ‘असंभव'चे प्रदर्शन

मराठीतील चार नावाजलेले, गुणी आणि दमदार कलाकार म्हणजे मुक्ता बर्वे, सचित पाटील, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी हे

देवीच्या जत्रेत छाया कदमची कोकणात हजेरी

अभिनेत्री छाया कदम यांनी कोकणातील धामापूर गावातील सातेरी देवीच्या जत्रेला हजेरी लावत एक खास व्हिडीओ सोशल