मुंबईच्या लोकसंख्येने ओलांडला १ कोटी ३० लाखांचा टप्पा, एका वर्षात ४६ हजारांची पडली भर

मुंबई (खास प्रतिनिधी) : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईची लोकसंख्या २०२५मध्ये १ कोटी ३१ लाख ०७ हजार १७७एवढी असल्याची समोर आली आहे. २०२४मध्ये ही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार


लोकसंख्येची आकडेवारी १ कोटी ३० लाख ६० हजार ७८१ एवढी होती. एक वर्षांत मुंबईतील लोकसंख्या ४६ हजारांनी वाढल्याचे अहवालातील आकडेवारीनुसार समोर येत आहे.


मुंबईचे क्षेत्रफळ व त्यातील लोकसंख्या २०२४-२५ चा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालाचा आधार देत पालिकेचा पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, मुंबईचे क्षेत्रफळ जे ४३७ चौरस किलोमीटर होते, ते आता ४८३.२२ चौरस किलोमीटर एवढे आहे. यामध्ये २०२३-२०२४ मध्ये १ कोटी ३० लाख ६० हजार ७८१ लोकसंख्या होती, जी २०२४-२५ मध्ये १ कोटी ३१ लाख ७हजार १७७ एवढी असल्याची नोंद झाली आहे.


सर्वाधिक लोकसंख्या ही मालाड परिसरात ९ लाख ९१ हजार ६६५ एवढी आहे, तर सर्वाधिक कमी लोकसंख्या बी विभागात आहे. बी विभागात १ लाख ३४ हजार ९१ एवढी लोकसंख्या आहे. त्यामुळे एका वर्षांत ४६ हजार लोकसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे.


सन २०२५ मध्ये मुंबईचे क्षेत्रफळ व लोकसंख्या


मुंबईचे एकूण क्षेत्रफळ : ४८३.२२ चौरस किलोमीटर


मुंबईची एकूण लोकसंख्याः १ कोटी ३१ लाख ०७ हजार ७७१


मुंबई शहर एकूण क्षेत्रफळ ७२.०१ चौ.कि.मी., (लोकसंख्याः ३२,५०,२६६ः)


पश्चिम उपनगराचे क्षेत्रफळ २३२.५५ चौ.कि.मी., (लोकसंख्याः ५८,२२,३३९)


पूर्व उपनगराचे क्षेत्रफळ १७८.५७ चौ.कि.मी. (लोकसंख्याः ४०,३४,५७२ )

Comments
Add Comment

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ‘लाडकी कर्मचारी बहीण’ म्हणून गौरवणार; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई: ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ आणि ‘रस्ते स्वच्छता योजना’ अंतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना

मुंबईत उभारणार मल्टी-मॉडेल टनेल; रस्ते वाहतुकीसोबतच सेवा सुविधांच्या जाळ्यांसाठी असेल स्वतंत्र मार्ग

मुंबई: वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पूरस्थितीवर प्रभावी

मुंबईतील फोर्ट परिसरात आग; बाबेल हॉटेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर...

मुंबई: मुंबईतील फोर्ट परिसरात आग लागली. ही आग ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांवर लागली. तसेच ती हॉटेल इमारतीच्या

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

चेंबूरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मजूर पडल्याने महापौरांनी दिले कडक कारवाईचे आदेश

मुंबई: चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सहा मजूर पडले. या दुर्घटनेत एकाचा

BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील