वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप यांसारख्या समस्या जाणवतात. अशा वेळी अनेकजण आपल्याजवळ वेदनाशामक औषधांचा साठा ठेवतात, जेणेकरून लागल्यास त्यांचा उपयोग करून लगेच आराम मिळवता येईल. परंतु ही सवय चांगली नाही, कारण किरकोळ वेदनांवरही जर पेन किलर घेत राहिलात, तर भविष्यात याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.


आजकालच्या जलद जीवनशैलीत अनेकांना स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. दुखू लागल्यावर वेदनाशामक औषधांचा वापर करून दुखणं तात्पुरते थांबवण्याची सवय नेहमीच असते. पण, हे करणं अत्यंत चुकीचं आहे. विशेषतः थंडीच्या दिवसांत डोकेदुखी किंवा अंगदुखी होत असताना लगेच पेन किलर घेणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.


वेदनाशामक औषधांचा वापर हानिकारक आहे. जर तुम्ही पेन किलर वारंवार घेत असाल, तर यामुळे अनेक आरोग्यसमस्यांचा सामना करावा लागतो.


अपचन:
तज्ज्ञांच्या मते, पेन किलरचे अति सेवन केल्यास पोटाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. गॅस, ॲसिडिटी, अल्सर आणि गॅस्ट्रिक रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.


किडनीच्या समस्या:
पेन किलरचे वारंवार सेवन केल्याने किडनीमध्ये त्याचे बारीक कण जमा होऊ शकतात, ज्यामुळे किडनी स्टोन, किडनी निकामी होणे यांसारखी गंभीर आजार होण्याची शक्यता असते.


स्नायू कमकुवत होणे:
सतत पेन किलर घेतल्याने स्नायू कमकुवत होतात आणि हृदयाचे अनियमित ठोके आणि थकवा यासारखी लक्षणे दिसू शकतात, जे थंडीत अधिक तीव्र होऊ शकतात.


म्हणूनच, पेन किलरचे सेवन शक्यतो टाळा आणि आरोग्याच्या गंभीर समस्यांपासून वाचण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घेतले पाहिजे.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण