सरकारी रुग्णवाहिका नावालाच, महिलेची भर रस्त्यात प्रसूती

वावी हर्ष येथील घटना; आदिवासींच्या नशिबी नेहमीच वनवास


नाशिक : दोन तासापासून कॉल करून रुग्णवाहिका न आल्याने गरोदर मातेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना त्रंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्ष येथे बुधवारी घडली आहे. कॉल करूनही वाहन उपलब्ध करून न देणाऱ्या यंत्रणेचा जाहीर निषेध केला जात असून आदिवासींच्या नशिबी नेहमीच वनवास असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


मातेला आणि बाळाला शासनाने मोफत अॅम्बुलन्स सुविधा उपलब्ध करून दिली मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी होतच नसल्याने भर रस्त्यात डिलिव्हरी ची वेळ आली होती. सुदैवाने खाजगी वाहनाने महिलेला रुग्णालयात नेले जात असतानाच वाहनातच तिची डिलिव्हरी सुखरुप झाली. या प्रकाराने सरकारी रुग्णवाहिका चा प्रश्न आणि कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वावी हर्षेतील एका महिलेला सकाळी प्रसूती वेदना सुरू झाल्याने सकाळी सहा वाजेपासून सदर महिला १०२, १०८ वर कॉल करून अॅम्बुलन्स ची मागणी करत होती मात्र त्यांना अनेक कारणे सांगून अॅम्बुलन्स देण्यास नकार दिला. शेवटी त्या मातेला खाजगी वाहनातून त्र्यंबकेश्वर येथे डिलिव्हर साठी देत असताना पहिने गावा जवळ खाजगी वाहनामध्ये डिलिव्हरी झाली. सुदैवाने तिची डिलिव्हरी सुखरूप झाली.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल