ब्रिटनच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

मुंबई : भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर यांचे स्वागत केले.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


पंतप्रधान म्हणून स्टार्मर यांचा हा पहिला अधिकृत भारत दौरा असून, हा दौरा भारत-ब्रिटन संबंधांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.



पंतप्रधान मोदी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईत ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे स्वागत करतील. त्यानंतर दोन्ही देशांचे पंतप्रधान दुपारी १:४० वाजता मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित 'सीईओ फोरम'ला उपस्थित राहतील. तसेच, दुपारी २:४५ वाजता ते सहाव्या ग्लोबल फिनटेक महोत्सवात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करतील.


धोरणात्मक भागीदारीचा 'व्हिजन २०३५' आराखडा


या भेटीदरम्यान, दोन्ही नेते 'व्हिजन २०३५' या पथदर्शी आराखड्याच्या अनुषंगाने भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतील. व्हिजन २०३५ हा व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित केलेला १० वर्षांचा कालबद्ध मार्गदर्शक आराखडा आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र