ब्रिटनच्या पंतप्रधानांचे मुंबईत आगमन; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

मुंबई : भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर यांचे स्वागत केले.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


पंतप्रधान म्हणून स्टार्मर यांचा हा पहिला अधिकृत भारत दौरा असून, हा दौरा भारत-ब्रिटन संबंधांना नवी दिशा देणारा ठरणार आहे.



पंतप्रधान मोदी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईत ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे स्वागत करतील. त्यानंतर दोन्ही देशांचे पंतप्रधान दुपारी १:४० वाजता मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित 'सीईओ फोरम'ला उपस्थित राहतील. तसेच, दुपारी २:४५ वाजता ते सहाव्या ग्लोबल फिनटेक महोत्सवात सहभागी होऊन उपस्थितांना संबोधित करतील.


धोरणात्मक भागीदारीचा 'व्हिजन २०३५' आराखडा


या भेटीदरम्यान, दोन्ही नेते 'व्हिजन २०३५' या पथदर्शी आराखड्याच्या अनुषंगाने भारत आणि ब्रिटनमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतील. व्हिजन २०३५ हा व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान, ऊर्जा, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित केलेला १० वर्षांचा कालबद्ध मार्गदर्शक आराखडा आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर