शेतकऱ्यांसाठी मंत्री महाजनांचा मोठा निर्णय, सुपूर्द केला वर्षभराचा ‘पगार’

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी मंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभराच्या पगाराचा धनादेश 31,18,286 सुपूर्द केला आहे. ही रक्कम राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेच्या मदतीसाठी समर्पित केल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


राज्यातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व आर्थिक नुकसान झाले आहे. अशा संकटसमयी प्रत्येक जबाबदार नागरिकाने शक्य ती मदत करणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. सरकार आपली जबाबदारी पार पाडत असतानाच, नागरिक म्हणून आपणदेखील पुढे येऊन हातभार लावणे गरजेचे आहे.


माझ्या या छोट्याशा प्रयत्नातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, हीच मनापासून इच्छा आहे. अश्या भावना मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकारी सदस्य उपस्थित होते. मंत्री महाजन यांच्या या निर्णयाचे जामनेरात तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व जनतेकडून स्वागत होत आहे.

Comments
Add Comment

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध

फलटण महिला डॉक्टर प्रकरण, हॉटेल रूममधल्या 'त्या' शेवटच्या क्षणांचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; डॉक्टरच्या आत्महत्येमागे नेमकं काय घडलं?

फलटण : महाराष्ट्रातील फलटण शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यात

पोलिसांनी तरुणीसह आरोपींच्या फोनचे CDR काढले, हाती आली 'ही' माहिती

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी