संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे हे स्वत:चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे सांगावे ओरडून अशा प्रकारचे असल्याचे भारताने उघड केले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्येही पाकिस्तानने हेच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी पाकिस्तानचे वास्तव सर्वांना सांगितले. पाकिस्तान हा असा देश आहे, जो स्वतःच्या लोकांवर बॉम्ब टाकतो. तसेच आपली कृती लपवण्यासाठी जगासमोर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत राहतो, असे म्हणत पार्वथानेनी हरीश म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाच्या सायमा सलीम यांनी परिषदेत काश्मीरी महिलांच्या सुरक्षेबाबत टिपणी केली. त्या म्हणाल्या, काश्मीरी महिला अनेक दशकांपासून त्रास सहन करत आहेत. त्यांचा वापर युद्धासाठीचे शस्त्रास्त्र म्हणून केला जात आहे आणि वर्षानुवर्षे त्यांना लैंगिक हिंसाचार सहन करावा लागत आहे." या टिप्पणीवरुन भारताने पाकिस्तानला धारेवर धरले.

पाकिस्तानने आजवर फक्त जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरुन राजकारण केले आहे. मात्र आजवर भारताच्या सीमाभागावर कब्जा केल्याचे पाकिस्तान बोलत नाही. पाकिस्तानच्या सैन्याने १९७१ मध्ये ऑपरेशन सर्चलाइटमध्ये आपल्याच देशातील चार लाख महिलांवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यांची हत्या केली. तसेच आजवर पाकिस्तानने केवळ जगाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केला, असे भारताचे स्थायी प्रतिनिधि पार्वथानेनी हरीश यांनी परिषदेत सांगितले. यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानची पंचाईत झाली.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधीने सांगितले की महिला, शांतता आणि सुरक्षा अजेंड्यावर भारताची कामगिरी उत्तम आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्यात भारताच्या डॉ. किरण बेदी यांनी पोलीस अधिकारी म्हणून केलेली कामगिरी कौतुकास्पद आणि सर्वश्रूत आहे. त्या काही काळ संयुक्त राष्ट्रांच्या पोलीस दलाच्या प्रमुख होत्या. भारताने कायमच महिलांचा सन्मान केला आहे महिलांच्या प्रगतीसाठी कार्य केले आहे. याउलट स्थिती पाकिस्तानची असल्याचे भारताने ठासून सांगितले.
Comments
Add Comment

पुतिन यांच्या घरावरील हल्ल्यानंतर रशियाकडून घातक ‘ओरेशनिक’ क्षेपणास्त्र तैनात

मास्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानी ड्रोन हल्ला झाल्यानंतर रशियाने

बांग्लादेशमध्ये दीपू दासनंतर तिसऱ्या हिंदूची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

ढाका : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, मैमनसिंग जिल्ह्यात

Khaleda Zia Death : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन

खालिदा झिया यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर 'स्टाईल स्टेटमेंट'मधूनही गाजवलं सत्तेचं रणांगण! साधेपणा, काळा चष्मा

बांगलादेशात हिंदूंवर ईशनिंदेशी संबंधित ७१ हल्ले

एकसारखाच पॅटर्न - आधी सोशल मीडियावर आरोप, नंतर जमावाचा हिंदू वस्त्यांवर हल्ला ढाका : बांगलादेशात हिंदू

इंडोनेशियात भीषण दुर्घटना

जकार्ता : इंडोनेशियात एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (२८ डिसेंबर) संध्याकाळी एका रिटायरमेंट होमला भीषण आग

बांग्लादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचं निधन

ढाका: बांग्लादेशच्या पहिला महिला पंतप्रधान खालिदा जिया यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही