‘त्या’ ६५ इमारतींवरील कारवाई प्रकरणी आयुक्तांसह अधिकारी वादाच्या भोवऱ्यात

कल्याण (प्रतिनिधी) : बोगस महारेरा प्रकरणातील ६५ इमारतींवर कारवाई न केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे अवमान याचिका दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आयुक्तांसह अधिकारी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी डोंबिवली शहर परिसरात उभ्या राहिलेल्या महारेरा प्रकरणातील ६५ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गेल्यावर्षी पाटील यांच्या याचिकेवरून ११ नोव्हेंबर २०२४ रोजी हे आदेश देण्यात आले होते.


वर्ष उलटूनही कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने चालढकलपणा करत, राजकीय दबावामुळे त्या बेकायदा इमारतींवर कारवाई केली नाही. त्यामुळे, याचिकाकर्ते पाटील यांनी ज्येष्ठ वकील अ‍ॅड. पी. एल. भुजबळ यांच्यामार्फत माजी आणि सध्याच्या अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांवर, ज्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही, त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. यांत नगरविकास, पालिका, पोलीस, नगररचना आणि महारेरा या विविध विभागांचे अधिकारी सामील आहेत.


कडोंमपाचे विद्यमान आयुक्त अभिनव गोयल, तत्कालीन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिम कुमार गुप्ता, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, राज्याच्या नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश बागुल (पुणे), महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, तत्कालीन उपायुक्त अवधूत तावडे, आणि उपायुक्त समीर भूमकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करण्यापूर्वी, पाटील यांनी वकिलामार्फत तीन वेळा न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याबद्दल पालिकेला कळवले होते, पण पालिकेने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Comments
Add Comment

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

शाहरुख खानच्या ‘किंग’च्या आंतरराष्ट्रीय वितरणासाठी रेड चिलीज एंटरटेनमेंट, मार्फ्लिक्स पिक्चर्स आणि यशराज फिल्म्स यांची ऐतिहासिक भागीदारी

मुंबई : रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी शाहरुख खान अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट

'मिर्झापूर: द फिल्म'च्या अखेरच्या शूटिंगनंतर अली फजल भावूक, शेअर केला खास संदेश

मुंबई: बहुप्रतीक्षित 'मिर्झापूर: द फिल्म'चे अखेरचे शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले असून, भारतातील सर्वात लोकप्रिय

सलमान खानचा 'तेरे नाम' २२ वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

Tere Nam Re-release Date : सलमान खानचा 'तेरे नाम' हा चित्रपट परत येत आहे आणि सलमान खानचे चाहते या चित्रपटाचा अनुभव घेण्यासाठी

नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरलं आणि... खारमधील हृदयपिळवणारा प्रकार

मुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा