“तुम्ही संत्री कशी खाता?” : FICCI Frames 2025 मध्ये अक्षय कुमारने फडणवीसांना विचारला गंमतीशीर प्रश्न !

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मिश्कील शैलीसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "तुम्ही आंबे कसे खाता?" असा प्रश्न विचारून ट्रोलिंगला सामोरे गेलेला अक्षय, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका अनपेक्षित आणि मजेशीर प्रश्नाने गोंधळात टाकताना दिसला.


FICCI Frames 2025 च्या उद्घाटन कार्यक्रमात अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात एक छोटासा संवाद रंगला. गप्पांच्या ओघात अक्षयने फडणवीसांना विचारले, "तुम्ही नागपूरचे आहात... संत्री कशी खाता? सोलून का ज्यूस करून?" यावर उपस्थितांनी जोरदार हास्यकल्लोळ केला.


मुख्यमंत्र्यांनीही या प्रश्नाला उत्स्फूर्त आणि खास नागपुरी शैलीत उत्तर दिले. “संत्र्याचे दोन भाग करा, त्यावर थोडं मीठ टाका आणि आंब्यासारखं सरळ खा. नागपूरच्या लोकांची ही खास पद्धत आहे,” असे फडणवीस म्हणाले. यावर अक्षयनेही उत्तर दिलं, "ही पद्धत मी नक्की करून पाहीन."


अक्षय कुमार म्हणाला, "ही माझी दुसरी मुलाखत आहे. पहिल्यांदा मी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं - ‘तुम्ही आंबा कसा खाता?’ आणि त्यावेळी खूप लोकांनी मला ट्रोल केलं. पण मी अजूनही बदललो नाही!”


या गमतीशीर संवादाने कार्यक्रमात उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. दरम्यान, जेव्हा फडणवीस यांना विचारण्यात आले की त्यांच्या राजकीय प्रवासात एखादा प्रेरणादायी चित्रपट आहे का, तेव्हा त्यांनी 'नायक: द रिअल हिरो' या चित्रपटाचा उल्लेख केला.


"हा चित्रपट मला केवळ प्रेरणा देणारा नाही तर अनेकवेळा अडचणीचे कारण ठरला आहे. मी जिथे जातो, लोक मला विचारतात, तुम्ही ‘नायक’ सारखं काम का करत नाहीस? एका दिवसात अनिल कपूरने इतकं काही करून दाखवलं, मग तुम्ही का नाही करू शकत?” असं फडणवीसांनी मिश्कीलपणे सांगितलं.

Comments
Add Comment

Pedii Box Office Collection : पेड्डीचा बॉक्स ऑफिसवर धडाका! 2 दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) यांचा बहुचर्चित 'पेड्डी' (Peddi) चित्रपट बॉक्स

Kangana Ranaut : मराठी कलाकार आणि रंगभूमीचे कंगनाकडून भरभरून कौतुक; म्हणाली, '२० वर्षांत पहिल्यांदाच...'

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) बहुचर्चित चित्रपट 'भारत भाग्य विधाता' (Bharat Bhhagya Viddhaata) १२ जून रोजी प्रदर्शित होत

Aamir Khan : आमिर खानची तिसऱ्या लग्नाची तयारी ; चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया

मुंबई : वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खान तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे अशी घोषणा त्याने स्वतःह एका मुलाखती

Pranit More : कॉमेडियन प्रणित मोरे वादाच्या भोवऱ्यात; आक्षेपार्ह व्हिडीओवर माफी, म्हणाला- ती चूक झाली

Pranit More Controversy : बिग बॉस 19 चा स्पर्धक आणि प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरे सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे वादात सापडला आहे.

Actress Sambhavna : शेवटी देवाने एका आईची हाक ऐकलीच; चक्क ४५ वर्षांच्या अभिनेत्रीने दिला जुळ्या मुलांना जन्म

मुंबई : लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की तिने आई व्हाव . काहीचं हे स्वप्न पूर्ण होतं तर काहींचं होत नाही

Ritesh Deshmukh : "महाराजांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता"; व्हायरल व्हिडीओनंतर रितेश देशमुखचे स्पष्टीकरण, ट्रोलर्सना दिले चोख उत्तर

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश