“तुम्ही संत्री कशी खाता?” : FICCI Frames 2025 मध्ये अक्षय कुमारने फडणवीसांना विचारला गंमतीशीर प्रश्न !

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या मिश्कील शैलीसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "तुम्ही आंबे कसे खाता?" असा प्रश्न विचारून ट्रोलिंगला सामोरे गेलेला अक्षय, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका अनपेक्षित आणि मजेशीर प्रश्नाने गोंधळात टाकताना दिसला.


FICCI Frames 2025 च्या उद्घाटन कार्यक्रमात अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात एक छोटासा संवाद रंगला. गप्पांच्या ओघात अक्षयने फडणवीसांना विचारले, "तुम्ही नागपूरचे आहात... संत्री कशी खाता? सोलून का ज्यूस करून?" यावर उपस्थितांनी जोरदार हास्यकल्लोळ केला.


मुख्यमंत्र्यांनीही या प्रश्नाला उत्स्फूर्त आणि खास नागपुरी शैलीत उत्तर दिले. “संत्र्याचे दोन भाग करा, त्यावर थोडं मीठ टाका आणि आंब्यासारखं सरळ खा. नागपूरच्या लोकांची ही खास पद्धत आहे,” असे फडणवीस म्हणाले. यावर अक्षयनेही उत्तर दिलं, "ही पद्धत मी नक्की करून पाहीन."


अक्षय कुमार म्हणाला, "ही माझी दुसरी मुलाखत आहे. पहिल्यांदा मी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं - ‘तुम्ही आंबा कसा खाता?’ आणि त्यावेळी खूप लोकांनी मला ट्रोल केलं. पण मी अजूनही बदललो नाही!”


या गमतीशीर संवादाने कार्यक्रमात उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. दरम्यान, जेव्हा फडणवीस यांना विचारण्यात आले की त्यांच्या राजकीय प्रवासात एखादा प्रेरणादायी चित्रपट आहे का, तेव्हा त्यांनी 'नायक: द रिअल हिरो' या चित्रपटाचा उल्लेख केला.


"हा चित्रपट मला केवळ प्रेरणा देणारा नाही तर अनेकवेळा अडचणीचे कारण ठरला आहे. मी जिथे जातो, लोक मला विचारतात, तुम्ही ‘नायक’ सारखं काम का करत नाहीस? एका दिवसात अनिल कपूरने इतकं काही करून दाखवलं, मग तुम्ही का नाही करू शकत?” असं फडणवीसांनी मिश्कीलपणे सांगितलं.

Comments
Add Comment

'बालिका वधू'ची आनंदी विवाहबंधनात! लग्नानंतर 'सिंदूर-मंगळसूत्र' लूकमध्ये पतीसोबत दिसली

टीव्ही अभिनेत्री अविका गोर आणि मिलिंद चंदवाणी अडकले विवाहबंधनात; राष्ट्रीय टीव्हीवर होणार प्रसारण मुंबई:

'फिर से गुड न्यूज' भारती आणि हर्षने खास पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी!

मुंबई : आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री भारती सिंग आणि

‘प्रेमाची गोष्ट २'चा अनोखा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई  : 'प्रेमाची गोष्ट २' या चर्चेत असलेल्या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला

आलिया भट सोबत कोण दिसणार मुख्य भूमिकेत ? विकी कौशल की रणबीर कपूर ?

लवकरच रणबीर कपूर आणि विकी कौशल एका जबरदस्त सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत . येत्या ईद ला संजय लीला

राष्ट्रपती बघणार कांतारा चॅप्टर १ चित्रपट

नवी दिल्ली : बॉलीवूड सोबतच आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचीही लोकप्रियता वाढत आहे. जगभर दाक्षिणात्य चित्रपट

‘मुंज्या’ मधली शर्वरी आणि अहान पांडे अ‍ॅक्शन-रोमँटिक चित्रपटात झळकणार

मुंबई : अभिनेत्री शर्वरी वाघ लवकरच यशराज फिल्म्सच्या आगामी अ‍ॅक्शन आणि रोमँटीक चित्रपटात झळकणार आहे, ज्याचे