पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

या दिवशी होणाऱ्या विमानतळाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात देशभरातून मान्यवर, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ६:१० वाजल्यापासून रात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

पनवेल, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना उद्घाटनाच्या दिवशी वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पर्यायी मार्गांची आखणी केली आहे. अवजड वाहन चालकांनी निर्धारित वेळेत प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

वाहतूक पोलिसांनी कार्यक्रमस्थळी आणि आसपासच्या परिसरात विशेष पथके तैनात केली असून, सुरक्षा व शिस्तबद्ध वाहतूक राखण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास