नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा


नाशिक(प्रतिनिधी): आठवड्यातून तीनच दिवस मर्यादित असलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत करण्यात आली असून आता दररोज दोन वेळा ही सेवा उपलब्ध असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने रविवारी २६ ऑक्टोबर २०२५ पासून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नाशिक ते दिल्ली विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून,औद्योगिक, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.


नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू असल्याने नाशिक-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीनच दिवस करण्यात आली होती. यामुळे नाशिकहून दिल्लीला जाणारे पर्यटक, नियमितपणे ये-जा करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत होती. या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी उड्डयाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याशी १२ जुलै २०२५ रोजी पत्रव्यवहार करत ही विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती.


नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने दि.१६ सप्टेंबरपासून नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली. १८० आसनांचे विमान असून उद्योजक आणि व्यावसायिकांना ही विमानसेवा लाभदायी ठरेल. एका दिवसात दिल्लीतील कामे आटोपल्यानंतर नाशिकला परत येणे शक्य होईल. तसेच नाशकात अनेक पर्यटन कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी या कंपन्यांना ही विमानसेवा फायदेशीर ठरणार आहे.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २५ कोटींपेक्षा अधिक भाविक नाशिकला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरदेखील ही विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे. कुंभमेळ्यासाठी उत्तर भारतातून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार्या भाविकांसाठी या विमानसेवेचा चांगलाच लाभ होईल. दरम्यान, इतर मार्गांवरही विमानसेवा सुरु होणार आहेत.सध्या नवी दिल्ली, हैदराबाद, गोवा, नागपूर, बेंगळुरू, अहमदाबाद या शहरांमध्ये जाण्यासाठी नाशिकहून विमानसेवा सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक-इंदूर-जयपूर विमानसेवा खंडित झाली होती. त्यामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय झाली होती. आता इंडिगो कंपनीच्या माध्यमातून दि. २८ ऑक्टोबरपासून आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवारी नाशिक-इंदूर-जयपूर तसेच नाशिक-हैदराबाद अतिरिक्त विमान देखील सुरू करण्यात येणार आहे.


विमानतळ सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न


नाशिक हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर असून या ठिकाणाहून देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव ये-जा करणार्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नाशिकचे विमानतळ अधिकाधिक सुसज्ज करण्याबरोबरच जास्तीतजास्त शहरांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री


नाशिकची अर्थव्यवस्था बळकट होईल


या सुविधेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी अधिक वाढेल आणि व्यवसाय, पर्यटन वाढण्याबरोबरच नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यास मदत होईल.यामुळे रोजगार निर्मितीतही भर पडेल आणि नाशिकची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. - मनीष रावल, उद्योजक ,उपाध्यक्ष निमा, विमान वाहतूक समिती अध्यक्ष, एमएसीसीआयए महाराष्ट्र आणि आयमा



Comments
Add Comment

PV Sindhu : जपान ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवून रचला इतिहास

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले

Ind vs Eng : भारत - इंग्लंड तिसरी ODI किती वाजता सुरू होणार ? कशी असेल लॉर्ड्सची खेळपट्टी ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर

US Visa : एफ-१ आणि जे-१ व्हिसाधारकांसाठी अमेरिकेचे नवे नियम; भारतीय विद्यार्थ्यांची वाढली चिंता

नवी दिल्ली : अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने (डीएचएस) स्थलांतराशी संबंधित एक नवा आणि कठोर नियम लागू

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

Maharashtra Weather : आनंदाची बातमी! महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊस पडणार

मुंबई : मागील दीड महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. आता राज्यात पुन्हा एकदा

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून