नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा


नाशिक(प्रतिनिधी): आठवड्यातून तीनच दिवस मर्यादित असलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत करण्यात आली असून आता दररोज दोन वेळा ही सेवा उपलब्ध असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने रविवारी २६ ऑक्टोबर २०२५ पासून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नाशिक ते दिल्ली विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून,औद्योगिक, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.


नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू असल्याने नाशिक-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीनच दिवस करण्यात आली होती. यामुळे नाशिकहून दिल्लीला जाणारे पर्यटक, नियमितपणे ये-जा करणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत होती. या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी उड्डयाणमंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याशी १२ जुलै २०२५ रोजी पत्रव्यवहार करत ही विमानसेवा पूर्ववत करण्याची मागणी केली होती.


नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने दि.१६ सप्टेंबरपासून नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू करण्यात आली. १८० आसनांचे विमान असून उद्योजक आणि व्यावसायिकांना ही विमानसेवा लाभदायी ठरेल. एका दिवसात दिल्लीतील कामे आटोपल्यानंतर नाशिकला परत येणे शक्य होईल. तसेच नाशकात अनेक पर्यटन कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी या कंपन्यांना ही विमानसेवा फायदेशीर ठरणार आहे.


आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २५ कोटींपेक्षा अधिक भाविक नाशिकला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरदेखील ही विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे. कुंभमेळ्यासाठी उत्तर भारतातून नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येणार्या भाविकांसाठी या विमानसेवेचा चांगलाच लाभ होईल. दरम्यान, इतर मार्गांवरही विमानसेवा सुरु होणार आहेत.सध्या नवी दिल्ली, हैदराबाद, गोवा, नागपूर, बेंगळुरू, अहमदाबाद या शहरांमध्ये जाण्यासाठी नाशिकहून विमानसेवा सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक-इंदूर-जयपूर विमानसेवा खंडित झाली होती. त्यामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानला जाणाऱ्या पर्यटकांची गैरसोय झाली होती. आता इंडिगो कंपनीच्या माध्यमातून दि. २८ ऑक्टोबरपासून आठवड्यातील मंगळवार, गुरुवार व शनिवारी नाशिक-इंदूर-जयपूर तसेच नाशिक-हैदराबाद अतिरिक्त विमान देखील सुरू करण्यात येणार आहे.


विमानतळ सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न


नाशिक हे देशातील वेगाने विकसित होणारे शहर असून या ठिकाणाहून देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणास्तव ये-जा करणार्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नाशिकचे विमानतळ अधिकाधिक सुसज्ज करण्याबरोबरच जास्तीतजास्त शहरांना जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. - छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री


नाशिकची अर्थव्यवस्था बळकट होईल


या सुविधेमुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी अधिक वाढेल आणि व्यवसाय, पर्यटन वाढण्याबरोबरच नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक येण्यास मदत होईल.यामुळे रोजगार निर्मितीतही भर पडेल आणि नाशिकची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल. - मनीष रावल, उद्योजक ,उपाध्यक्ष निमा, विमान वाहतूक समिती अध्यक्ष, एमएसीसीआयए महाराष्ट्र आणि आयमा



Comments
Add Comment

India Seychelles Relations : सेशेल्स दौऱ्यात भारताचे मोठे पाऊल; १९ करारांवर स्वाक्षऱ्या, संरक्षण ते UPI पर्यंत सहकार्याला चालना

सेशेल्स : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सेशेल्स दौऱ्यात भारत (India) आणि सेशेल्स (Seychelles) यांच्यातील संबंध अधिक

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरण, तीन आरोपींना पोलीस कोठडी

ठाणे/भिवंडी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या

Nashik News : नाशिकमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आढळला तरुणाचा मृतदेह, पोलीस तपास सुरु

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील वडाळा नाका परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये एका तरुणाचा मृतदेह (Deathbody) आढळून आला. या घटनेनंतर

Kidambi Srikanth : किदांबी श्रीकांतच्या खिलाडूवृत्तीने जिंकली प्रेक्षकांची मने

कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth)

Thane Palghar DCC Bank : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून ‘सहकार

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई