ही महादेवाची पवित्र भूमी, इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल


मीरा रोड : मीरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा खेळत असलेल्या महिलांवर धर्मांध समाजकंटकांनी अंडी फेकून वातावरण बिघडवण्याचा घृणास्पद प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती मिळताच मंत्री नितेश राणे यांनी घटनास्थळाला भेट दिली. घडलेल्या प्रकाराची माहिती स्थानिकांकडून घेतली. तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील विजय विनायक गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि उपस्थित नागरिकांना संबोधित केले. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्यामुळे, समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. शांतता भंग करणाऱ्या विघातक प्रवृत्तीला ठेचून काढू; असे मंत्री नितेश राणे म्हणाले.


ही महादेवाची पवित्र भूमी आहे. इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही महादेवाचा हिंदुस्तान आहे. इथे महिलांशी वाईट वर्तन करणाऱ्याला दणका दिला जाईल, यासाठी आवश्यकता भासली तर तिसरा डोळा उघडावा लागेल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. हिंदू राष्ट्रात महिलांवर अन्याय खपवून घेणार नही. महिलांना त्रास दिला तर थयथयाट होईल जो कोणाला सहन होणार नाही; असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.


?si=7eO88epaWlexPAeS

Comments
Add Comment

कधी सुरू होणार महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ?

मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे. विधिमंडळ

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम