मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता


मुंबई  : मुंबईत उबाठा गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावत भाजप-शिवसेना महायुती सत्तेची शर्यत पार करणार, असा अंदाज एक्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचण्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील अन्य महापालिकेतही भाजपचा वरचष्मा राहणार असल्याचे संकेत या चाचण्यांनी दिले आहेत. विविध संस्थांच्या चाचण्यांचे निष्कर्ष पाहिले असता राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांच्या बाजुने मतदारांनी कौल दिल्याचे दिसते.


मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने गेले पंधरा दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. त्यातही मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील राजकीय घडामोडी विशेष चर्चेत आल्या. दोन दशकांचा दुरावा मिटवत ठाकरे बंधु या निवडणुकांसाठी एक झाले. त्यामुळे ठाकरे बंधु विरूद्ध भाजप-शिवसेना शिंदे गट महायुतीने एकमेकांवर टीकेची झोड उठवत राजकीय वातावरण तापविल्याने मुंबईची निवडणूक ही लक्षवेधी बनली. गुरूवारी, मतदानाच्या दिवशीही या आरोप - प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू होत्या. सर्वसाधारणपणे मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकेतील मतदान सुरळीत पार पाडले. शुक्रवारी, मतमोजणी नंतर मतदारांचा जनादेश समोर येणार आहे. तत्पूर्वी, मतदानाचा कालावधी संपल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाले. अॅक्सिस माय इंडिया, जनमत, रूद्र रिसर्च, प्राब, जेव्हिसी एक्झिट पोल, जेडीएस, डिव्ही रिसर्च अशा संस्थांनी मतादानाची वेळ संपल्यानंतर तासाभरात आपल्या एक्झिट पोलचे अंदाज जारी केली.


या एक्झिट पोलनी वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबईत ठाकरे बंधुंच्या युतीचे आव्हान मोडून काढत भाजप महायुतीचा विजयरथ सत्तेवर येण्याची शक्यता आहे. 'अॅक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलनुसार मुंबई महापालिकेची सत्ता महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील एकूण २२७ जागांपैकी भाजप-शिंदे गटाला १३१ ते १५१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, ठाकरे बंधुंच्या युतीला ५८ ते ६८ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. काँग्रेस - वंचित आघाडीला १२ ते १६ आणि इतरांना ६ ते १२ जागा मिळतील असा अंदाज अॅक्सिस माय इंडियाने वर्तविला आहे.


जनमत एक्जिट पोलनेही मुंबईत सत्तापालटाचे भाकीत केले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला १३८ जागा मिळतील, तर शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांच्या आघाडीला ६२ जागा मिळतील. तसेच काँग्रेस-वंचितला २० तर इतरांना ७ जागा मिळणार असल्याचा अंदाज जनमतने व्यक्त केला आहे.


रुद्र रिसर्चनुसार, मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गट १२१, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे ७१, काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला २५ जागा मिळतील. तर इतरांना १० जागा मिळतील, असा अंदाज रूद्र रिसर्चने व्यक्त केला आहे. 'द जेव्हीसी एक्झिट पोल'नेही मुंबईत भाजप-शिंदे गट महायुतीला १२९ ते १४६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर, ठाकरे बंधूंना ५४ ते ६४ जागांवर समाधान मानावे लागू शकते. काँग्रेस-वंचित आघाडी २१ ते २५ आणि इतरांना ६ ते ९ जागा मिळू शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.


टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत भाजपची सत्ता येणार असून मतांची टक्केवारीही महायुतीच्या बाजूने राहणार असल्याचा दावा केला आहे. महायुतीला ४२ ते ४५ टक्के, ठाकरे बंधुंच्या आघाडीला ३४ ते ३७ टक्के तर काँग्रेस- वंचित आघाडीला १३ ते १५ टक्के मते मिळू शकतात असा अंदाज या एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Dharavi Development Project : धारावी विकास प्रकल्पांत तब्बल ८ हजार झाडे होणार बाधित

- पालघरमध्ये २३ हजार तर धारावीतच लावली जाणार ३० हजार झाडे मुंबई (सचिन धानजी) धारावीचा विकास करण्यासाठी

Commonwealth Games 2026 Raja Muthupandi : कॉमनवेल्थमध्ये भारताचा दबदबा; गंभीर दुखापतीनंतर राजा मुथुपंडीने जिंकले रौप्यपदक

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ (Commonwealth Games 2026) मध्ये भारताच्या वेटलिफ्टिंग संघाने (Weightlifting) दमदार कामगिरी कायम ठेवत आणखी एक

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक