सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात


कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने दमदार सुरुवात केली आहे. भारताने बारा षटकांत एक बाद ५५ धावा केल्या आहेत. स्मृती मंधाना २३ धावा करुन बाद झाली. फातिमा सनाने स्मृतीला पायचीत केले. आता प्रतिका रावल आणि हरलीन देओल या दोघी खेळत आहेत.


पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. विश्वचषकात भारताचा पहिला साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने ५९ धावांनी जिंकला. पाकिस्तान विरुद्धचा सामना हा भारताचा दुसरा साखळी सामना आहे. हा सामना जिंकल्यास चार गुणांसह भारत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचणार आहे. सध्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलियाचा महिला क्रिकेट संघ तीन गुणांसह पहिल्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला आणि श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे तीन गुणांसह ऑस्ट्रेलिया गुणतक्त्यात पहिल्या स्थानी पोहोचली.


भारतीय महिला क्रिकेट संघ : प्रतिका रावल , स्मृती मानधना , हरलीन देओल , हरमनप्रीत कौर (कर्णधार) , जेमिमाह रॉड्रिग्स , रिचा घोष (यष्टीरक्षक) , दीप्ती शर्मा , स्नेह राणा , रेणुका सिंग ठाकूर , क्रांती गौड , श्री चरणी


पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ : मुनीबा अली , सदाफ शमास , सिद्रा अमीन , रमीन शमीम , आलिया रियाझ , सिद्रा नवाज (यष्टीरक्षक) , फातिमा सना (कर्णधार) , नतालिया परवेझ , डायना बेग , नशरा संधू , सादिया इक्बाल


Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य