दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७ जणांचे प्राण गेले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे दार्जिलिंगचा सिक्कीमशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे, तर अनेक महत्त्वाचे रस्तेही बंद झाले आहेत.


गोरखालँड प्रादेशिक प्रशासनाने (GTA) खबरदारीचा उपाय म्हणून टायगर हिल, रॉक गार्डनसह प्रमुख पर्यटनस्थळे तात्पुरती बंद केली आहेत. याशिवाय टॉय ट्रेन सेवा देखील स्थगित करण्यात आली आहे.


दार्जिलिंग, मिरिक आणि सुखियापोखरी परिसरात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यामुळे बचाव कार्य सुरु असून, स्थानिक पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके युद्धपातळीवर काम करत आहेत.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.


दुर्गापूजेनंतर दार्जिलिंगमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेक पर्यटक अडकले असल्याची शक्यता आहे. बंगाल पोलिसांनी ९१४७८८९०७८ हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे, ज्यावर अडकलेल्या पर्यटकांना मदतीसाठी संपर्क करता येईल.


दरम्यान, उत्तर बंगालमधील जलपाईगुडी, सिलिगुडी, कूचबिहार या भागातही पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.


हवामान खात्याने ७ ऑक्टोबरपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून, सिक्कीमसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक व पर्यटकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण