खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने तत्काळ खबरदारीची पावले उचलली आहेत. या सिरपमध्ये 'डायथिलीन ग्लायकॉल' (Diethylene Glycol) नावाचे विषारी रसायन आढळल्याचा संशय आहे.


राज्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कठोर पाऊले उचलली आहेत. 'कोल्ड्रिफ' या कफ सिरपच्या एका विशिष्ट बॅचच्या (Batch No. SR-13) विक्रीवर, साठवणुकीवर आणि वितरणावर महाराष्ट्रात तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.



माहिती देण्यासाठी टोल-फ्री क्रमांक


या संदर्भात कोणतीही माहिती देण्यासाठी, तसेच नागरिकांकडे जर या प्रतिबंधित बॅचचे सिरप आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्यासाठी राज्याच्या FDA विभागाने टोल-फ्री क्रमांक आणि ईमेल आयडी जारी केला आहे.


टोल-फ्री क्रमांक: 1800-222-365



नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर त्यांच्याकडे 'कोल्ड्रिफ' सिरपची Batch No. SR-13 ही आढळल्यास त्यांनी त्वरित वरील क्रमांकावर संपर्क साधावा.



पालकांना महत्त्वाचे आवाहन


आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही कफ सिरप देऊ नये. विशेषतः पाच वर्षांखालील मुलांना खोकल्याचे सिरप देणे टाळावे. सर्दी-खोकला झाल्यास डॉक्टरांच्या लेखी सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावेत.


एफडीएने राज्यातील सर्व किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते आणि रुग्णालयांना तातडीने या विशिष्ट सिरपचा साठा गोठवण्याचे (freeze करण्याचे) आदेश दिले आहेत. पुढील तपासणी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन