खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने तत्काळ खबरदारीची पावले उचलली आहेत. या सिरपमध्ये 'डायथिलीन ग्लायकॉल' (Diethylene Glycol) नावाचे विषारी रसायन आढळल्याचा संशय आहे.


राज्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कठोर पाऊले उचलली आहेत. 'कोल्ड्रिफ' या कफ सिरपच्या एका विशिष्ट बॅचच्या (Batch No. SR-13) विक्रीवर, साठवणुकीवर आणि वितरणावर महाराष्ट्रात तत्काळ बंदी घालण्यात आली आहे.



माहिती देण्यासाठी टोल-फ्री क्रमांक


या संदर्भात कोणतीही माहिती देण्यासाठी, तसेच नागरिकांकडे जर या प्रतिबंधित बॅचचे सिरप आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला देण्यासाठी राज्याच्या FDA विभागाने टोल-फ्री क्रमांक आणि ईमेल आयडी जारी केला आहे.


टोल-फ्री क्रमांक: 1800-222-365



नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर त्यांच्याकडे 'कोल्ड्रिफ' सिरपची Batch No. SR-13 ही आढळल्यास त्यांनी त्वरित वरील क्रमांकावर संपर्क साधावा.



पालकांना महत्त्वाचे आवाहन


आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही कफ सिरप देऊ नये. विशेषतः पाच वर्षांखालील मुलांना खोकल्याचे सिरप देणे टाळावे. सर्दी-खोकला झाल्यास डॉक्टरांच्या लेखी सल्ल्यानुसारच औषधोपचार घ्यावेत.


एफडीएने राज्यातील सर्व किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते आणि रुग्णालयांना तातडीने या विशिष्ट सिरपचा साठा गोठवण्याचे (freeze करण्याचे) आदेश दिले आहेत. पुढील तपासणी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा