तर त्या पुरस्काराला काही अर्थ नाही: राणी मुखर्जी

एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या राष्ट्रीय पुरस्कारानंतरच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “३० वर्षांनंतर मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय खास आहे. राणी पुढे म्हणाली, “या वर्षी शाहरुख खानलाही त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आम्हा दोघांसाठीही हा अनुभव खूप समाधानकारक होता. कारण-जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो आणि लोक म्हणतात की, ‘तिला तो मिळायला नको होता’, तेव्हा त्या पुरस्काराला काही अर्थ उरत नाही.


पण जेव्हा लोक असं म्हणतात की, ‘या पुरस्कारासाठी तीच पात्र होती’, तेव्हा आम्हा कलाकारांना खरा आनंद होतो आणि समाधान मिळतं.” या संवादात राणीनं कलाकारांसाठी पुरस्काराचं महत्त्व काय असतं? यावरही प्रतिक्रिया दिली.


याबद्दल ती म्हणाली, “प्रत्येक कलाकारासाठी पुरस्काराचं महत्त्व हे असतंच. मी प्रेक्षकांसाठी काम करते. माझं काम त्यांना आवडावं म्हणून मी इतकी मेहनत करते. जेव्हा मला एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा ते आनंदित होतात आणि त्यांना माझे चाहते किंवा प्रेक्षक असल्याचा अभिमान वाटतो.


त्यामुळे हो… पुरस्कार मिळणं हे कलाकारासाठी खूप खास असतं.” राणी मुखर्जीनं याआधी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’साठीचे काही पुरस्कार जिंकले आहेत; मात्र राष्ट्रीय पुरस्कार तिला पहिल्यांदाच मिळाला. असंच काहीसं शाहरुख खानच्याही बाबतीत घडलं. त्यालाही ‘जवान’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Comments
Add Comment

‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी

मुंबई : सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी

श्रेया घोषालच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी! ओडिसाच्या बाली यात्रेला गालबोट

ओडिसा: सुप्रसिद्ध भारतीय गायिका श्रेया घोषालचा ओडिसा कटक येथे १३ नोव्हेंबरला लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला होता.

‘गोंधळ’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय झेप!

पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता आंतरराष्ट्रीय

‘होय, मी जयभीमवाली. मी त्यांच्यातलीच…’ चिन्मयी सुमितचं बेधडक वक्तव्य

सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. विषय कोणताही असो, हे सेलिब्रिटी (Celebrity) आपलं

न्यूरोस्पाईन सर्जरीला नवी दिशा देणाऱ्या डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा ‘ताठ कणा’

माणसाला धैर्य त्याच्याच ताठ कण्यामुळे मिळते’, हे वि. वा. शिरवाडकरांचे वाक्य डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी आपल्या

मराठी कथा, पटकथा आणि रंगमंचाचा जादूगार - कपिल भोपटकर

मराठी रंगभूमी व टेलिव्हिजन जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे लेखक - दिग्दर्शक कपिल भोपटकर सध्या त्यांच्या