तर त्या पुरस्काराला काही अर्थ नाही: राणी मुखर्जी

एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या राष्ट्रीय पुरस्कारानंतरच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “३० वर्षांनंतर मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय खास आहे. राणी पुढे म्हणाली, “या वर्षी शाहरुख खानलाही त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आम्हा दोघांसाठीही हा अनुभव खूप समाधानकारक होता. कारण-जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो आणि लोक म्हणतात की, ‘तिला तो मिळायला नको होता’, तेव्हा त्या पुरस्काराला काही अर्थ उरत नाही.


पण जेव्हा लोक असं म्हणतात की, ‘या पुरस्कारासाठी तीच पात्र होती’, तेव्हा आम्हा कलाकारांना खरा आनंद होतो आणि समाधान मिळतं.” या संवादात राणीनं कलाकारांसाठी पुरस्काराचं महत्त्व काय असतं? यावरही प्रतिक्रिया दिली.


याबद्दल ती म्हणाली, “प्रत्येक कलाकारासाठी पुरस्काराचं महत्त्व हे असतंच. मी प्रेक्षकांसाठी काम करते. माझं काम त्यांना आवडावं म्हणून मी इतकी मेहनत करते. जेव्हा मला एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा ते आनंदित होतात आणि त्यांना माझे चाहते किंवा प्रेक्षक असल्याचा अभिमान वाटतो.


त्यामुळे हो… पुरस्कार मिळणं हे कलाकारासाठी खूप खास असतं.” राणी मुखर्जीनं याआधी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’साठीचे काही पुरस्कार जिंकले आहेत; मात्र राष्ट्रीय पुरस्कार तिला पहिल्यांदाच मिळाला. असंच काहीसं शाहरुख खानच्याही बाबतीत घडलं. त्यालाही ‘जवान’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Comments
Add Comment

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

गरोदरपणानंतर रुबिना दिलीकचा आत्मविश्वास डगमगला!

मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल

दशावतार सिनेमाने अवघ्या तीन आठवड्यात केला विक्रम... २१ दिवसात किती कोटी कमावले?

दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत