तर त्या पुरस्काराला काही अर्थ नाही: राणी मुखर्जी

एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या राष्ट्रीय पुरस्कारानंतरच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “३० वर्षांनंतर मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय खास आहे. राणी पुढे म्हणाली, “या वर्षी शाहरुख खानलाही त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आम्हा दोघांसाठीही हा अनुभव खूप समाधानकारक होता. कारण-जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो आणि लोक म्हणतात की, ‘तिला तो मिळायला नको होता’, तेव्हा त्या पुरस्काराला काही अर्थ उरत नाही.


पण जेव्हा लोक असं म्हणतात की, ‘या पुरस्कारासाठी तीच पात्र होती’, तेव्हा आम्हा कलाकारांना खरा आनंद होतो आणि समाधान मिळतं.” या संवादात राणीनं कलाकारांसाठी पुरस्काराचं महत्त्व काय असतं? यावरही प्रतिक्रिया दिली.


याबद्दल ती म्हणाली, “प्रत्येक कलाकारासाठी पुरस्काराचं महत्त्व हे असतंच. मी प्रेक्षकांसाठी काम करते. माझं काम त्यांना आवडावं म्हणून मी इतकी मेहनत करते. जेव्हा मला एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा ते आनंदित होतात आणि त्यांना माझे चाहते किंवा प्रेक्षक असल्याचा अभिमान वाटतो.


त्यामुळे हो… पुरस्कार मिळणं हे कलाकारासाठी खूप खास असतं.” राणी मुखर्जीनं याआधी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’साठीचे काही पुरस्कार जिंकले आहेत; मात्र राष्ट्रीय पुरस्कार तिला पहिल्यांदाच मिळाला. असंच काहीसं शाहरुख खानच्याही बाबतीत घडलं. त्यालाही ‘जवान’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Comments
Add Comment

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

'आई कुठे काय करते' फेमस 'ही' अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; जाणून घ्या तिच्या पार्टनरबद्दल

आई कुठे काय करते या मालिकेत ईशा हे पात्र रंगवणारी फेमस अभिनेत्री अपूर्वा गोरे ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपट ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार, मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत पुनीत इस्सर दिसणार

मुंबई: ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांसाठी एक भव्य आणि उत्कंठावर्धक अनुभव

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ‘भिडेवाडा’ रुपेरी पडद्यावर

पुणे : ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही

'भिडेवाडा'चं पाहिलं पोस्टर रिजिल; सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत...

भिडेवाडा येथे महात्मा जोतीबा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरु

‘वाराणसी’बाबत एस. एस. राजामौली, महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांची खास प्रतिक्रिया

‘वाराणसी’मुळे सिनेविश्वात उत्सुकतेची लाट; राजामौली, महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा यांचा खास खुलासा मुंबई : एस.