लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ


पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी उमेदवारीवरून जोरदार गोंधळ झाला. लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या निवासस्थानी आरजेडीचे आमदार सतीश कुमार यांच्या उमेदवारीला विरोध करत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी करत गोंधळ घातला. यावेळी आम्हाला चोरटा आमदार नको, सतीश कुमार यांना हरवायचे आहे, अशी घोषणाबाजी केली.


बिहारमधील मखदुमपूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सतीश कुमार यांच्या उमेदवारीला विरोध करत अनेक कार्यकर्ते मखदुमपूर विधानसभा मतदारसंधातून पाटणा येथे आले होते. कार्यकर्ते अचानक लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी घुसले. विद्यमान आमदार सतीश कुमार यांनी कुठलेही काम केलेले नाही. जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली.


लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी अचानक झालेल्या या आंदोलनामुळे एकच गोंधळ उडाला. सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्व केला. मात्र बराच वेळ हा गोंधळ सुरू होती. या घटनेमुळे निवडणुकीच्या तोंडावर आरजेडीच्या नेतृत्वाची अडचण वाढली आहे. तसेच तिकीट वाटपावरून अंतर्गत विरोधही वाढला आहे. मखदुमपूर येथून उमेदवारी कुणाला द्यायची हा प्रश्न उभा राहिला आहे


Comments
Add Comment

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन