नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर २०२५ मध्ये होणार सुरू

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दी कमी करेल. पहिल्या टप्प्यात ₹१९,६४७ कोटी खर्चून बांधलेले हे विमानतळ, मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि मुंबईला जागतिक बहु-विमानतळ प्रणालींच्या श्रेणीत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासोबत काम करेल. ज्यामुळे वार्षिक १५० दशलक्ष पर्यंत एकत्रित प्रवासी क्षमता असलेले विमान वाहतूक केंद्र तयार होईल. यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि उर्वरित मुंबई महानगर प्रदेशातील लोकांसाठी प्रादेशिक आर्थिक वाढ, व्यवसायाच्या संधी, रोजगार आणि सुरळीत प्रवास अनुभवाला चालना देईल. नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) ३० सप्टेंबर २०२५ रोजी एनएमआयएला एअरोड्रोम परवाना मंजूर केला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण ऑपरेशन्स सुरू होण्याची शक्यता आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड यांनी स्थापन केलेल्या विशेष कंपनी - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडद्वारे सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित केले जात आहे. ह्या कंपनीमध्ये अदानी विमानतळ होल्डिंग्ज मुख्य प्रवर्तक आहे. हजारो रोजगार निर्माण झाले आहेत, त्यामुळे लाखो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील, विशेषतः रायगड, ठाणे, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाची वैशिष्ट्ये :


* ११६० हेक्टर क्षेत्रफळ
* जगातील सर्वात कार्यक्षम विमानतळांपैकी एक म्हणून डिझाइन केलेले आहे.
* दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष टन माल वाहून नेले जाईल.
* पहिल्या टप्प्यातील सुविधा अनुक्रमे २० एमपीपीए आणि ०.५ दशलक्ष मेट्रिक टन माल वाहून नेण्याची क्षमता
* दरवर्षी ३.२५ दशलक्ष मेट्रिक टनांपेक्षा जास्त माल वाहून नेण्याची क्षमता
* पायाभूत सुविधांमध्ये ३ हजार ७०० मीटर लांबीचे दोन समांतर कोड-४ एफ धावपट्ट्या
* धावपट्ट्यांना वाढीव कार्यक्षमतेसाठी दुहेरी समांतर टॅक्सीवे आणि जलद एक्झिट टॅक्सीवेद्वारे जोडले आहे.
* पहिल्या टप्प्यात दक्षिण रनवे कार्यान्वित


भारतातील पहिले खऱ्या अर्थाने बहु-मॉडेल विमानतळ: हे विमानतळ जल वाहतुकद्वारे जोडलेले पहिले विमानतळ असेल. मुंबई महानगर प्रदेशाच्या प्रत्येक कोपऱ्याशी जोडण्यासाठी एक अखंड मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्ट नेटवर्क विकसित केले जात आहे. अटल सेतू सारखे महत्त्वाचे प्रकल्प ,उलवे कोस्टल रोड आणि प्रस्तावित ठाणे- नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग जलद, सिग्नल-मुक्त रस्ते कनेक्टिव्हिटी प्रदान करतील. मेट्रो लाईन ८, २०३१ पर्यंत नवी मुंबई मेट्रो विस्तारांच्या मदतीने नवी मुंबई आणि मुंबई विमानतळाला आणि मुंबईशी थेट जोडेल.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: अद्वितीय वैशिष्ट्ये:


* ऑटोमेटेड पीपल मूव्हर (एपीएम) प्रणाली, सुरळीत आंतर-टर्मिनल हस्तांतरणासाठी चारही प्रवासी टर्मिनल्सना जोडण्याची योजना आहे. तसेच शहराच्या पायाभूत सुविधांना जोडणारा लँडसाइड एपीएम देखील आहे.
* विमानतळावर शाश्वत विमान इंधनासाठी समर्पित साठवणूक, अंदाजे ४७ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती आणि ईव्ही बस सेवा
*पहिल्या टप्प्यात, नवी मुंबई विमानतळ,२९ कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड, १३ रिमोट कमर्शियल स्टँड, ७ कार्गो स्टँड आणि ३८ जनरल एव्हिएशन (जीए) स्टँडसह काम करेल ज्यावर १५ जीए हँगर्स असतील, तसेच १,५०० कार, २० बस आणि २० ट्रकसाठी पार्किंग सुविधा असतील.
* अति महत्वाची व्यक्ती आणि खाजगी विमान वाहतुकीसाठी अंतिम टप्प्यात जवळजवळ १०० जीए विमान स्टँड असलेले एक पूर्ण विकसित जीए टर्मिनल बांधण्याची योजना आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिका निवडणूक, महायुतीचं ठरलं; भाजप १३७ आणि शिवसेना ९० जागा लढणार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. भाजप आणि शिवसेनेत

भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने १३ जणांना चिरडले

मुंबई : भांडुप स्टेशनजवळ बेस्टच्या बसने रात्री दहाच्या सुमारास १३ जणांना चिरडले. या अपघातात तीन महिला आणि एक

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांनी घेतली मतदान नियमावलीची माहिती अन् अनुभवले ईव्हीएम यंत्राचे प्रात्यक्षिक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार

मुंबई महापालिका निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. यात २७ उमेदवारांचा

मुंबई महापालिका निवडणूक; अर्ज विक्री साडेअकरा हजारांची, भरले गेले फक्त ४०१

शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न झाल्याने अर्ज भरणाऱ्याचे घटले प्रमाण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईतील शरद पवार यांच्या राष्ट्र्वादी काँग्रेसचे अस्तित्व संपले

राखी जाधव भाजपात तर मनिषा रहाटे, पिसाळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबई (विशेष प्रतिनिधी)