गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात ३० सप्टेंबर २०२५ रोजी अपघात झाला होता. या अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटील हिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.



अपघाताची घटना


मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला. गौतमी पाटीलच्या भरधाव कारने थांबलेल्या एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षाचे मोठे नुकसान झाले.


या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षातील आणखी दोन प्रवासीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला होता, मात्र सिंहगड रोड पोलिसांनी काही तासांतच आरोपी चालकाला अटक केली असून कारही जप्त करण्यात आली आहे.



गौतमी पाटीलला नोटीस का?


अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, ही कार गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने, या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी सिंहगड रोड पोलिसांनी तिला हजर राहण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले आहेत.



कुटुंबीयांचे गंभीर आरोप आणि अटकेची मागणी


जखमी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर आणि कारवाईवर गंभीर आरोप केले आहेत. गौतमी पाटील सेलिब्रिटी असल्यामुळे पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आणि मूळ आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मरगळे कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आरोपी बदलल्याचा दावाही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अपघातानंतर गौतमी पाटीलच्या टीमकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही असाही आरोप करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा