गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात ३० सप्टेंबर २०२५ रोजी अपघात झाला होता. या अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटील हिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.



अपघाताची घटना


मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला. गौतमी पाटीलच्या भरधाव कारने थांबलेल्या एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षाचे मोठे नुकसान झाले.


या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षातील आणखी दोन प्रवासीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला होता, मात्र सिंहगड रोड पोलिसांनी काही तासांतच आरोपी चालकाला अटक केली असून कारही जप्त करण्यात आली आहे.



गौतमी पाटीलला नोटीस का?


अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, ही कार गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने, या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी सिंहगड रोड पोलिसांनी तिला हजर राहण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले आहेत.



कुटुंबीयांचे गंभीर आरोप आणि अटकेची मागणी


जखमी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर आणि कारवाईवर गंभीर आरोप केले आहेत. गौतमी पाटील सेलिब्रिटी असल्यामुळे पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आणि मूळ आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मरगळे कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आरोपी बदलल्याचा दावाही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अपघातानंतर गौतमी पाटीलच्या टीमकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही असाही आरोप करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु