गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात ३० सप्टेंबर २०२५ रोजी अपघात झाला होता. या अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटील हिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.



अपघाताची घटना


मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला. गौतमी पाटीलच्या भरधाव कारने थांबलेल्या एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षाचे मोठे नुकसान झाले.


या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षातील आणखी दोन प्रवासीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला होता, मात्र सिंहगड रोड पोलिसांनी काही तासांतच आरोपी चालकाला अटक केली असून कारही जप्त करण्यात आली आहे.



गौतमी पाटीलला नोटीस का?


अपघाताच्या वेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, अशी माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, ही कार गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने, या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी सिंहगड रोड पोलिसांनी तिला हजर राहण्याचे आदेश नोटीसद्वारे दिले आहेत.



कुटुंबीयांचे गंभीर आरोप आणि अटकेची मागणी


जखमी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर आणि कारवाईवर गंभीर आरोप केले आहेत. गौतमी पाटील सेलिब्रिटी असल्यामुळे पोलीस योग्य तपास करत नसल्याचा आणि मूळ आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप मरगळे कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी आरोपी बदलल्याचा दावाही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अपघातानंतर गौतमी पाटीलच्या टीमकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही असाही आरोप करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे