मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याकडून फुलंब्री धरण परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

मच्छीमार बांधवांचा संवाद साधत उपाययोजना करण्याचे आश्वासन


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :  मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री धरण परिसरातील मच्छीमारांच्या नुकसानग्रस्त भागांची शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत मंत्री राणे यांनी मच्छीमार बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्यांचा आढावा घेतला आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.


पाहणीदरम्यान, नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या समजून घेतल्या गेल्या आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आवश्यक प्रशासनिक पावले, मदत आणि सहाय्य यावर चर्चा करण्यात आली. मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा तातडीने, अचूक व पारदर्शक पद्धतीने करण्याच्या ठोस सूचना दिल्या, जेणेकरून नुकसानाचे अचूक दस्तऐवजीकरण होईल आणि त्यानंतर योग्य आर्थिक व प्रशासनिक मदत पोहोचवता येईल.


सदर पाहणीदरम्यान स्थानिक आमदार अनुराधा चव्हाण, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, तसेच इतर संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या अडचणींवर चर्चा केली आणि त्यांच्या तातडीच्या मदतीसाठी प्रशासनाची तत्परता  यावर  भर  दिला.

Comments
Add Comment

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

Honda India Power Products Q2 Results: होंडा इंडिया पॉवरचा तिमाही निकाल जाहीर निव्वळ नफ्यात थेट ३०.८०% वाढ

मोहित सोमण: होंडा इंडिया पॉवर प्रॉपर्टी लिमिटेडने आपला आर्थिक तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीला इयर ऑन इयर

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

महाराष्ट्र शासनाचे रत्ने व आभूषणे धोरण जाहीर

मुंबई : राज्य सरकारनं रत्ने आणि आभूषण उद्योगाला जागतिक स्पर्धेत आघाडीवर नेण्यासाठी राज्य शासनाने ‘रत्ने व