शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद


विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या मूर्तींचे विसर्जन मोठ्या जल्लोषात व सुरळीत पार पडले. मूर्ती विसर्जनासाठी पालिकेतर्फे २३ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते, तसेच ०४ जेट्टींच्या ठिकाणी व ०२ बंद दगड खाणींच्या ठिकाणीही विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या विसर्जनात १,६६७ घरगुती व ९५७ सार्वजनिक अशा एकूण २,६२४ मूर्तींचे विसर्जन झाले. यापैकी १,०७६ घरगुती व ४७७ सार्वजनिक असे एकूण १,५५३ मूर्तींचे विसर्जन पालिकेच्या कृत्रिम तलावांमध्ये झाले. तसेच ५९१ घरगुती व ४८० सार्वजनिक असे एकूण १,०७१ मूर्तींचे विसर्जन हे जेट्टीच्या व बंद दगड खाणींच्या ठिकाणी झाले.


पालिकेने विसर्जन स्थळी निर्माल्य जमा करणे साठी ठेवलेले निर्माल्य कलश, घट ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था, विद्युत व्यवस्था व इतर सर्व आवश्यक सोई सुविधा तसेच जेटीच्या व बंद दगड खाणींच्या ठिकाणी विसर्जनासाठी केलेली बोटीची, तराफ्यांची व्यवस्था, विसर्जन स्थळी केलेली सुरक्षा व्यवस्था यामुळे विसर्जन सुरळीत पार पडले. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त, सर्व उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, अग्निशमन कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी व इतर सर्व कर्मचारी यांनी विसर्जन स्थळी हजर राहून विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनानेही विसर्जनाच्या मार्गांवर ट्रॅफिकचे उत्तम नियोजन केल्यामुळे व मिरवणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घेतल्यामुळे विसर्जन योग्यरीत्या पार पडण्यास सहकार्य मिळाले.

Comments
Add Comment

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस

ठाणे-बोरिवली भुयारीकरणाला मार्चपासून सुरुवात

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे 'नायक' नावाच्या टनेल बोअरिंग

महावितरणने एका झटक्यात फेडले १२ हजार कोटींचे कर्ज

मुंबई : देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरणने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १२,८०० कोटी रुपयांच्या

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या

ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्याची ग्राहक पंचायतची मागणी

मुंबई  : देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये सध्या साडेपाय लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. सुनावणीदरम्यान