भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी


मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड, राखीव भूखंड मोठ्या प्रमाणात आहेत परंतु त्या ठिकाणच्या भुखंडावर मनपा प्रशासनाकडून नामफलक बसवण्यात आलेले नसल्याने सर्व मोकळ्या, राखीव भूखंडावर पालिकेच्या नावाचे नामफलक लवकरात लवकर बसवण्यात यावीत, अशी मागणी समाजसेवक गणेश नारायण वराडे यांनी मुंबई महापालिकेत केली आहे. ज्या ठिकाणी मनपाच्या मोकळ्या व राखीव भूखंडावर फलक लावण्यात आलेले नाही त्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी सुध्दा व्हायला हवी अशी देखील मागणी करण्यात आली.


मनपा एस विभाग हद्दीतील, भांडुप (प.) येथील जनता मार्केट परिसरातील महिंद्र सोसायटीच्या आवारात मनपाचे मोकळे व राखीव भूखंड असून त्यावर कोणत्याही प्रकारचा पालिकेच्या नावाचा फलक लावण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम पसरला असून हा भुखंड पालिकेचा की खासगी विकासकांचा ? असा सवालही गणेश वराडे यांनी केला आहे. हा भुखंड पालिकेच्या अखत्यारीत असेल तर पालिका प्रशासन या भुखंडावर फलक लावण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे. असा आरोपही वराडे यांनी केला आहे.


या मनपाच्या मोकळ्या आणि राखीव भुखंडावर पालिकेच्या नावाचे नामफलक लावणे गरजेचे आहे. अन्यथा असले भुखंड भविष्यात गिळंकृत होण्याची किंवा त्या ठिकाणी अतिक्रमणे होण्याची सुध्दा दाट शक्यता असल्याने मोकळ्या आणि राखीव भूखंडावर पालिकेच्या नावाचे फलक त्वरित लावण्यात यावेत अशी मागणी समाजसेवक वराडे यांनी मनपा एस विभागाकडे केली आहे.

Comments
Add Comment

Minister Chhagan Bhujbal : दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय गणना होणार; मंत्री छगन भुजबळ यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांचे पत्र

जातीनिहाय जनगणनेचा संभ्रम दूर मुंबई : जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नावलीत ओबीसींचा कॉलम नसल्याने

State Government : व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारकडून नवे धोरण जाहीर

 कमी पटसंख्येच्या शाळांना स्थलांतराच्या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले मुंबई : राज्यातील शाळांच्या

Uddhav Thackeray Eknath Shinde : "आम्ही इथे रिकामे बसलो नाही, नेत्यांना आवरा!" 'त्या' एका विनंतीने खंडपीठाची ठाकरे गटाला चपराक

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज महाराष्ट्राच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणाऱ्या अत्यंत

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

कर्जमाफी, शेतकरी मदत आणि ‘लखपती दीदी’ अभियानालाही वेग देणार सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

युवकांचा अवमान सहन करणार नाही, संजय राऊत माफी मागा

युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा इशारा देशातील युवक सुसंस्कृत, राऊतच मंद झालेत ठाणे : देशातील

महाराष्ट्रात भारनियमन इतिहासजमा होणार - 'मॅजेस्टिक' योजनेला मंजुरी

 जागतिक बँकेच्या सहकार्याने वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण करणार मुंबई : राज्यातील उद्योगांना आणि सर्वसामान्य