'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती


मुंबई : गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. कदमांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मातोश्रीवर काय घडलं याबाबत गंभीर आरोप करत संपूर्ण घटना उघडकीस आणण्याची मागणी केलीय.

दसरा मेळाव्यात रामदास कदम म्हणाले, “शिंदे साहेब, एक विनंती आहे. बाळासाहेबांचं निधन कधी झालं? त्यांची बॉडी मातोश्रीवर दोन दिवस का ठेवली गेली ? त्या वेळी मी स्वतः आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो, सगळं माझ्या नजरेसमोर घडलं. कोणीतरी सांगितलं होतं की बाळासाहेबांचे ठसे घेतले गेले. मृत्यूपत्र कोणाकडून तयार करण्यात आलं, त्यावर सही कोणी केली ?... हे सारे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. याची चौकशी व्हायला हवी.”



इतकंच नव्हे तर कदमांनी उद्धव ठाकरेंवर जुने शिवसैनिक संपवल्याचा आरोप केला. “आम्ही शिवसेना मोठी केली, जेल भोगली, लढलो. पण उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशी, दिवाकर रावते, गजानन कीर्तीकर, अगदी माझ्यासारखे नेतेही संपवले. एकनाथ शिंदे यांच्यामागेही उद्धव लागले होते. बाळासाहेब गेल्यानंतर ज्यांनी त्यांना पन्नास वर्षे साथ दिली, त्या सर्व नेत्यांना दूर सारण्याचं काम उद्धव यांनी केलं.”

कदमांनी मराठी माणूस आणि मुंबईतील बदलांबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, “मराठी माणसाला खरा सन्मान बाळासाहेबांनी दिला. पण गेली तीस वर्ष उद्धव ठाकरेंच्या हातात महानगरपालिका असूनही फक्त टक्क्याचं राजकारण झालं. गिरण्यांच्या जागी उंचच उंच इमारती झाल्या, पण त्यात एकही मराठी माणूस राहिला नाही. उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं ?”

रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्ला चढवत म्हटलं की, “राज ठाकरेंच्या मागे तुम्ही भीकेचा कटोरा घेऊन फिरता. दोन भाऊ नाही, दहा जणही सोबत आले तरी मुंबईकर तुम्हाला कायमचा गाडल्याशिवाय राहणार नाहीत, हा माझा विश्वास आहे.”

एकूणच, या दसरा मेळाव्यातील रामदास कदमांच्या भाषणाने उद्धव ठाकरेंविरोधात वातावरण तापवलं. बाळासाहेबांच्या निधनाशी संबंधित जुन्या घटनांचा उल्लेख करून त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आणि शिवसेनेच्या राजकारणावर कडाडून प्रहार केला. इतकंच काय तर त्यांनी माझी व उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा, अशी मागणी देखिल केलीय.
Comments
Add Comment

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली