माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस.रेड्डी, सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या चौघांनाही न्यायालयाने आणखी १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे जवळपास दीड महिन्यापासून कारागृहात असलेल्या पवार यांच्यासह चौघांचाही कारागृहातील मुक्काम वाढला आहे.


वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडे काय पुरावे होते आणि कोणत्या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली याबाबत प्रतिज्ञापत्रावर उत्तर सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने 'ईडी'ला बुधवारी दिले आहेत.


वसई-विरार पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड आणि मलनिःसारण प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर अवैधरित्या ४१ इमारती बांधून त्यातील खोल्या व सदनिका गरीब नागरिकांना विक्री करण्यात आल्या. बांधकाम करण्यात येत असलेल्या इमारती अवैध असतानाही विक्री केल्यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक केली म्हणून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांच्यासह आणखी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. हाच धागा पकडत अंमलबजावणी संचालनालय ईडीने या प्रकरणात कारवाई सुरू केली.


महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याकडे २३ कोटीचे दागिने आणि ९ कोटी रुपये रोख स्वरूपात सापडले. त्यानंतर महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी छापा टाकून ईडी ने महत्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, अनिलकुमार पवार यांच्यासह रेड्डी, सीताराम आणि अरुण गुप्ता हे चार जण १३ ऑगस्टपासून अटकेत आहेत. १४ ऑक्टोबरपर्यंत पवार यांच्यासह चौघांची न्यायालयीन कोठडी वाढविण्यात आली आहे. तर दुसरीकडे मात्र पवार यांनी ईडी ने केलेल्या अटकेच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जानेवारी २०२२ पासून आपण महापालिकेत रुजू झालो असून, बेकायदा बांधकाम प्रकरणात आपला संबंध नसताना ईडी ने आपल्याविरुद्ध कारवाई केल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. तसेच कनिष्ठ न्यायालयाने दिलेला कोठडीचा आदेश तांत्रिक पद्धतीचा असल्याबाबतही पवार यांच्या वकिलांनी न्यायालयात बुधवारी युक्तिवाद केला.


तर पवार यांचा अवैध बांधकाम घोटाळ्यात सहभाग असल्याचे पुरावे 'ईडी' कडे असल्याचे ईडीच्या वकिलांनी सांगितले. यावर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने पवार यांना अटक करण्यासाठी 'ईडी'कडे काय पुरावे होते ते आम्हाला प्रतिज्ञापत्रावर दाखवा असे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी १० ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात 'ईडी' च्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल सिंग यांनी म्हणणे मांडले आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर