आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे संपूर्ण देशभरात ई-सिम सेवा सुरू होणार आहे. ई-सिम हे एक डिजिटल सिम कार्ड आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड टाकण्याची गरज नसते. तुम्ही दूरस्थपणे मोबाइल कनेक्टिव्हिटी ॲक्टिव्हेट करू शकता. ज्यांच्याकडे ड्यूल-सिम फोन आहेत, ते लोक एकाच वेळी ई-सिम आणि नेहमीचे फिजिकल सिम कार्ड वापरू शकतील. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लोकल ऑपरेटरशी कनेक्ट होण्यासाठी ही सेवा खूप फायद्याची ठरणार आहे. टाटा कम्युनिकेशन्सचा 'मुव्ह प्लॅटफॉर्म' या ई-सिम सेवेला तांत्रिक पाठबळ देणार आहे. यामुळे बीएसएनएलला त्यांच्या देशभरातील ग्राहकांसाठी ई-सिमची व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे.


बीएसएनएलच्या या ई-सिम सेवेमुळे ग्राहकांना टू-जी, थ्री-जी आणि फोर-जी सेवांसाठी क्यूआर कोड स्कॅन करून लगेच कनेक्टिव्हिटी मिळवता येईल. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट रवी यांनी सांगितले की, "देशभरात ई-सिम सेवा सुरू करणे हे आमच्या राष्ट्रीय दूरसंचार क्षमतेमधील एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या मदतीने आम्ही नागरिकांसाठी मोबाइल सेवा अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवत आहोत."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ओडिशाच्या झारसुगुडा येथून संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित बीएसएनएलच्या फोर-जी नेटवर्कचे उद्घाटन केले. यासाठी ९७ हजार ५०० हून अधिक मोबाइल टॉवर्स उभे करण्यात आले आहेत.


पोस्ट ऑफिसमध्ये सेवा: कंपनीने पोस्ट विभागासोबत करार करून देशातील १.६५ लाख पोस्ट ऑफिसमधून सिम कार्ड विक्री आणि मोबाइल रिचार्ज सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या नवीन ई-सिम सुविधेमुळे बीएसएनएलचे ग्राहक आता अधिक आधुनिक आणि डिजिटल सेवांचा लाभ घेऊ शकतील.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला