आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे संपूर्ण देशभरात ई-सिम सेवा सुरू होणार आहे. ई-सिम हे एक डिजिटल सिम कार्ड आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये प्रत्यक्ष सिम कार्ड टाकण्याची गरज नसते. तुम्ही दूरस्थपणे मोबाइल कनेक्टिव्हिटी ॲक्टिव्हेट करू शकता. ज्यांच्याकडे ड्यूल-सिम फोन आहेत, ते लोक एकाच वेळी ई-सिम आणि नेहमीचे फिजिकल सिम कार्ड वापरू शकतील. विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान लोकल ऑपरेटरशी कनेक्ट होण्यासाठी ही सेवा खूप फायद्याची ठरणार आहे. टाटा कम्युनिकेशन्सचा 'मुव्ह प्लॅटफॉर्म' या ई-सिम सेवेला तांत्रिक पाठबळ देणार आहे. यामुळे बीएसएनएलला त्यांच्या देशभरातील ग्राहकांसाठी ई-सिमची व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे.


बीएसएनएलच्या या ई-सिम सेवेमुळे ग्राहकांना टू-जी, थ्री-जी आणि फोर-जी सेवांसाठी क्यूआर कोड स्कॅन करून लगेच कनेक्टिव्हिटी मिळवता येईल. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट रवी यांनी सांगितले की, "देशभरात ई-सिम सेवा सुरू करणे हे आमच्या राष्ट्रीय दूरसंचार क्षमतेमधील एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या मदतीने आम्ही नागरिकांसाठी मोबाइल सेवा अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवत आहोत."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच ओडिशाच्या झारसुगुडा येथून संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित बीएसएनएलच्या फोर-जी नेटवर्कचे उद्घाटन केले. यासाठी ९७ हजार ५०० हून अधिक मोबाइल टॉवर्स उभे करण्यात आले आहेत.


पोस्ट ऑफिसमध्ये सेवा: कंपनीने पोस्ट विभागासोबत करार करून देशातील १.६५ लाख पोस्ट ऑफिसमधून सिम कार्ड विक्री आणि मोबाइल रिचार्ज सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या नवीन ई-सिम सुविधेमुळे बीएसएनएलचे ग्राहक आता अधिक आधुनिक आणि डिजिटल सेवांचा लाभ घेऊ शकतील.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली:

दर्शनबंद! केदारनाथ आणि बद्रीनाथचे दरवाजे बंद करणार!

डेहराडून : बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे यावर्षी मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी पहाटे २:५६ वाजता बंद करण्यात येणार आहेत. तर

..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह

जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे