नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत आपल्या करोडपती बनण्याच्या स्वप्नाचा प्रवास केला आहे. अशातच नुकत्याच झालेल्या भागात नांदेडच्या एका शेतकऱ्याने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभाग घेतला होता. नांदेड जिल्ह्यातील कैलास रामभाऊ कुंटेवाद ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झाले होते आणि यावेळी त्यांनी हॉट सीटवर बसून सर्वांची मनं जिंकली. यावेळी त्यांनी सलग १४ प्रश्नांची अचूक उत्तरं देत ५० लाख रुपये जिंकले. त्यामधून अमिताभ बच्चन यांनी कैलास यांचं कौतुक केलं.


पुढे ५० लाखांनंतरच्या म्हणजेच एक कोटी रुपयांचा प्रश्न आला तेव्हा कैलास यांनी उत्तर देण्यासाठी ‘लाइफलाइन’ वापरली. पण, तरीसुद्धा त्यांना योग्य उत्तराची शंका होतीच. त्यामुळे त्यांनी धोका न पत्करता, शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ५० लाख रुपये इतकी रक्कम जिंकली. एक कोटीच्या प्रश्नाचं योग्य उत्तर कैलास यांना देता आलं नसलं तरी त्यांनी ५० लाखांपर्यंत कोणतीही मदत न घेता, प्रश्नोत्तरांचा हा खेळ अगदी यशस्वीरीत्या खेळला.



त्यामुळे त्यांचं कौतुक होताना दिसत आहे. या भागात अमिताभ बच्चन यांनी कैलास यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही माहिती दिली. कैलास हे शेती करून महिन्याला साधारण ३,००० रुपये कमावतात. ते क्रिकेटचे खूप मोठे चाहते असून, आपल्या दोन मुलांना क्रिकेटपटू बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. या शोमध्ये मिळालेल्या पैशातून ते आता मुलांना क्रिकेट अॅकॅडमीत घालणार आहेत.

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय