नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत आपल्या करोडपती बनण्याच्या स्वप्नाचा प्रवास केला आहे. अशातच नुकत्याच झालेल्या भागात नांदेडच्या एका शेतकऱ्याने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभाग घेतला होता. नांदेड जिल्ह्यातील कैलास रामभाऊ कुंटेवाद ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झाले होते आणि यावेळी त्यांनी हॉट सीटवर बसून सर्वांची मनं जिंकली. यावेळी त्यांनी सलग १४ प्रश्नांची अचूक उत्तरं देत ५० लाख रुपये जिंकले. त्यामधून अमिताभ बच्चन यांनी कैलास यांचं कौतुक केलं.


पुढे ५० लाखांनंतरच्या म्हणजेच एक कोटी रुपयांचा प्रश्न आला तेव्हा कैलास यांनी उत्तर देण्यासाठी ‘लाइफलाइन’ वापरली. पण, तरीसुद्धा त्यांना योग्य उत्तराची शंका होतीच. त्यामुळे त्यांनी धोका न पत्करता, शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ५० लाख रुपये इतकी रक्कम जिंकली. एक कोटीच्या प्रश्नाचं योग्य उत्तर कैलास यांना देता आलं नसलं तरी त्यांनी ५० लाखांपर्यंत कोणतीही मदत न घेता, प्रश्नोत्तरांचा हा खेळ अगदी यशस्वीरीत्या खेळला.



त्यामुळे त्यांचं कौतुक होताना दिसत आहे. या भागात अमिताभ बच्चन यांनी कैलास यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही माहिती दिली. कैलास हे शेती करून महिन्याला साधारण ३,००० रुपये कमावतात. ते क्रिकेटचे खूप मोठे चाहते असून, आपल्या दोन मुलांना क्रिकेटपटू बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. या शोमध्ये मिळालेल्या पैशातून ते आता मुलांना क्रिकेट अॅकॅडमीत घालणार आहेत.

Comments
Add Comment

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

अॅक्शन चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ लवकरच हॉलिवूड चित्रपटात दिसू शकतो. त्याचा पहिला चित्रपट एक जागतिक अॅक्शन थ्रिलर असेल. या

सुबोध भावे आणि मानसी नाईक जोडी प्रथमच एकत्र

सुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा 'सकाळ तर होऊ द्या' या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज

अभिषेक-ऐश्वर्या यांचा युट्यूबविरुद्ध खटला

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडीओंबद्दल युट्यूब आणि गुगलविरुद्ध दिल्ली

'मनाचे श्लोक' टीमकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे सोलापूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये

कांतारा १’ चा फर्स्ट रिव्ह्यू आऊट! प्रेक्षकांचा अफाट उत्साह

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ऋषभ शेट्टी दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘कांतारा : अ लेजेंड – चॅप्टर १’ अखेर