नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत आपल्या करोडपती बनण्याच्या स्वप्नाचा प्रवास केला आहे. अशातच नुकत्याच झालेल्या भागात नांदेडच्या एका शेतकऱ्याने ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभाग घेतला होता. नांदेड जिल्ह्यातील कैलास रामभाऊ कुंटेवाद ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झाले होते आणि यावेळी त्यांनी हॉट सीटवर बसून सर्वांची मनं जिंकली. यावेळी त्यांनी सलग १४ प्रश्नांची अचूक उत्तरं देत ५० लाख रुपये जिंकले. त्यामधून अमिताभ बच्चन यांनी कैलास यांचं कौतुक केलं.


पुढे ५० लाखांनंतरच्या म्हणजेच एक कोटी रुपयांचा प्रश्न आला तेव्हा कैलास यांनी उत्तर देण्यासाठी ‘लाइफलाइन’ वापरली. पण, तरीसुद्धा त्यांना योग्य उत्तराची शंका होतीच. त्यामुळे त्यांनी धोका न पत्करता, शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ५० लाख रुपये इतकी रक्कम जिंकली. एक कोटीच्या प्रश्नाचं योग्य उत्तर कैलास यांना देता आलं नसलं तरी त्यांनी ५० लाखांपर्यंत कोणतीही मदत न घेता, प्रश्नोत्तरांचा हा खेळ अगदी यशस्वीरीत्या खेळला.



त्यामुळे त्यांचं कौतुक होताना दिसत आहे. या भागात अमिताभ बच्चन यांनी कैलास यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही माहिती दिली. कैलास हे शेती करून महिन्याला साधारण ३,००० रुपये कमावतात. ते क्रिकेटचे खूप मोठे चाहते असून, आपल्या दोन मुलांना क्रिकेटपटू बनवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. या शोमध्ये मिळालेल्या पैशातून ते आता मुलांना क्रिकेट अॅकॅडमीत घालणार आहेत.

Comments
Add Comment

‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ने मारली झेप; प्राइम व्हिडिओवरील टॉप अनस्क्रिप्टेड शो

मुंबई : भारताची आवडती एंटरटेनमेंट डेस्टिनेशन असलेल्या प्राइम व्हिडिओने आपल्या अनस्क्रिप्टेड ओरिजिनल

ते माझ्यासाठी सर्वकाही होते… - हेमा मालिनीची भावुक पोस्ट

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या ८९व्या वर्षी झालेल्या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकात बुडाली. अनेक दशकं

अन्नप्रकियेतील उद्योगसंधी

करिअर : सुरेश वांदिले सध्या, देशाच्या अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्राचा १३ टक्के वाटा आहे. कृषी आणि

गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना 'मृदगंध जीवनगौरव पुरस्कार' प्रदान

मुंबई : मी मातीतला माणूस असून, लोककलेने माझे भरणपोषण केले. आज लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा जीवनगौरव

‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अभिनेत्री इशा केसकरने मालिका सोडण्याचा केला खुलासा

मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेतील कलाच्या पात्राची एंट्री आता संपली आहे. या बदलामुळे चाहत्यांमध्ये

Abhijeet Sawant and Gautami Patil : 'तो' AI Video नव्हता! गौतमी पाटील-अभिजीत सावंत लवकरच एकत्र; व्हायरल व्हिडीओमागचं खरं गुपित झालं OPEN.

काही दिवसांपूर्वी गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) आणि महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा एक