Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या एका स्पर्धकाने दाखवलेले शौर्य आणि पराक्रम पाहून उपस्थित जनसमुदाय थक्क झाला. या खंडा स्पर्धेदरम्यान, एका स्पर्धकाने केवळ चार मिनिटांमध्ये तब्बल ४२ किलो वजनाची खंडा तलवार डोक्यावरून ९० वेळा फिरवून एक विक्रमच प्रस्थापित केला. ही ४२ किलोची जड तलवार एका वेळी फिरवतानाही अनेकांची दमछाक होते. मात्र, या स्पर्धकाने दाखवलेला दमदार स्टॅमिना आणि कौशल्य वाखाणण्याजोगे होते. या अविश्वसनीय पराक्रमामुळे या स्पर्धकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि खंडोबाच्या गडावर जय भवानी-जय मल्हारच्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.






खंडा स्पर्धेमध्ये केवळ तलवार फिरवणे एवढेच नव्हे, तर अनेक मर्दानी कसरती सादर करण्यात आल्या. या स्पर्धेत प्राचीन युद्धकला आणि शारीरिक बळ यांचे प्रदर्शन करण्यात येते. यामध्ये तलवार एका हाताने तोलून धरणे, तलवारीला घेऊन वेगवेगळ्या शारीरिक कसरती करणे, जोर काढणे (पुशअप्स) आणि युद्धामध्ये ज्या पद्धतीने तलवार फिरवली जाते, त्या युद्धकलेचे प्रात्यक्षिक दाखवणे असे अनेक रोमांचक प्रकार सादर झाले. जेजुरीच्या या खंडा स्पर्धेमुळे मर्दानी दसरा उत्सवाला एक ऐतिहासिक आणि साहसी किनार मिळाली असून, प्राचीन युद्धकला जतन करण्याची परंपरा आजही कायम असल्याचे यातून सिद्ध होते.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : पेरणीची घाई करू नका!

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन; खरीप पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा केंद्र

Wedding Invitations : बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी पावले: लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य

मुंबई : राज्यातील बालविवाहाची (Child Marriage) प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या

Vilas Ghule Murder Case: विलास घुले खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, सर्व ९ आरोपी ताब्यात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या (Murder) प्रकरणात

Farmer loan waive : कर्जमाफी अन् अनुदानातील अडथळे दूर होणार; संबंधित विभागांना तातडीने बैठकांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या

Raigad Fort : दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २५ जूनपर्यंत बंद

रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)