..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह


जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे केंद्रीय रक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर) विजयादशमीच्या निमित्ताने पुनःएकदा पाकिस्तानला इशारा दिला. राजनाथ सिंग यांनी विजयादशमीच्या समारंभासाठी गुजरातमधील कच्छच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ते सैनिकांना संबोधित करताना बोलत होते.


राजनाथ सिंह म्हणाले, “स्वातंत्र्य प्राप्त झालेले ७८ वर्षे उलटून गेली तरीही सर क्रीकच्या भागात सीमेचा वाद कायम ठेवला जातो. भारताने अनेकदा संवादाच्या माध्यमातून याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे, पण पाकिस्तानचे हेतू शुद्ध नाही. पाकिस्तानी लष्कराने अलीकडेच सर क्रीकला लागून असलेल्या भागात ज्या पद्धतीने आपल्या लष्करी पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे, त्यावरून त्यांचे हेतू स्पष्ट होतात.”


पुढे ते म्हणाले की,“भारताच्या सीमांचे रक्षण भारतीय सैन्य आणि बीएसएफ मिळून दक्षतेने व तत्परतेने करत आहेत. जर सर क्रीक परिसरात पाकिस्तानकडून कोणतीही आक्रमकता झाली तर याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकले जातील. पाकिस्तानाने हे लक्षात ठेवावे की कराचीकडे जाणाऱ्या मार्गाचा एक भाग क्रीकमधून जातो.”


राजनाथ सिंह म्हणाले कि, “ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानने लेहपासून सर क्रीकपर्यंतच्या भागात भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे उघडकीस आणली आणि असा संदेश दिला की भारतीय सैन्य कितीही चांगले असले तरी ते कुठेही असले तरी ते पाकिस्तानचे मोठे नुकसान करेल.”


Comments
Add Comment

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने

Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह