..तर पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकू - राजनाथ सिंह


जयपूर : पाकिस्तानने जर सर क्रीक परिसरात कोणतीही आक्रमकता दाखवली तर त्याचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला जाईल, असे केंद्रीय रक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर) विजयादशमीच्या निमित्ताने पुनःएकदा पाकिस्तानला इशारा दिला. राजनाथ सिंग यांनी विजयादशमीच्या समारंभासाठी गुजरातमधील कच्छच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी ते सैनिकांना संबोधित करताना बोलत होते.


राजनाथ सिंह म्हणाले, “स्वातंत्र्य प्राप्त झालेले ७८ वर्षे उलटून गेली तरीही सर क्रीकच्या भागात सीमेचा वाद कायम ठेवला जातो. भारताने अनेकदा संवादाच्या माध्यमातून याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे, पण पाकिस्तानचे हेतू शुद्ध नाही. पाकिस्तानी लष्कराने अलीकडेच सर क्रीकला लागून असलेल्या भागात ज्या पद्धतीने आपल्या लष्करी पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे, त्यावरून त्यांचे हेतू स्पष्ट होतात.”


पुढे ते म्हणाले की,“भारताच्या सीमांचे रक्षण भारतीय सैन्य आणि बीएसएफ मिळून दक्षतेने व तत्परतेने करत आहेत. जर सर क्रीक परिसरात पाकिस्तानकडून कोणतीही आक्रमकता झाली तर याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकले जातील. पाकिस्तानाने हे लक्षात ठेवावे की कराचीकडे जाणाऱ्या मार्गाचा एक भाग क्रीकमधून जातो.”


राजनाथ सिंह म्हणाले कि, “ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानने लेहपासून सर क्रीकपर्यंतच्या भागात भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण भारतीय सैन्याने प्रत्युत्तरात पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे उघडकीस आणली आणि असा संदेश दिला की भारतीय सैन्य कितीही चांगले असले तरी ते कुठेही असले तरी ते पाकिस्तानचे मोठे नुकसान करेल.”


Comments
Add Comment

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रगीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या

Agni-5 Mk2 : अग्नी-5 Mk2 मध्ये मोठे अपग्रेड; वजन 20 टक्क्यांनी घटल्याचा दावा, वाढणार मारक क्षमता

नवी दिल्ली : भारत आपल्या संरक्षण क्षमतेत सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. ब्रह्मोस आणि अग्नी

Justice Yashwant Varma : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध; संसदेत चौकशी समितीचा अहवाल सादर

नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी

Karnataka Bandh : कावेरी पाणीवाटपाच्या विरोधात कर्नाटक बंद; जाणून घ्या काय सुरू, काय राहणार बंद?

बंगळुरू : कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (CWMA) १२ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस तमिळनाडूला दररोज १२ हजार क्युसेक

Ladakh Earthquake : लडाखमध्ये पहाटेच भूकंपाचा जोरदार धक्का! लेहमध्ये ५.५ रिश्टर स्केलचे हादरे, नागरिकांमध्ये घबराट

लेह : लडाखमधील लेह शहराला गुरुवारी पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सकाळी सुमारे ६ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं