शिंदेंचं एक पाऊल मागे! निवडणुकीत शिवसेना धाकटा भाऊ होणार, शिंदेंना कमी जागा मिळणार?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच आणि रणनीतीमुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेत. जागावाटपात शिवसेनेला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली आहे, तर भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे.


मुंबईत शिवसेनेचा जन्म झाला. तिथेच तिची पाळमुळं रुजली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेना मुंबई महापालिकेत नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. मात्र २०२२ च्या बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सातत्याने माघार घ्यावी लागतेय. लोकसभा, विधानसभा आणि आता मुंबई महापालिका निवडणुकीतही जागावाटपामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक पाऊल मागे घेताना दिसताहेत.


?si=R5YoTwOx00SRXlwc

लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला फक्त १५ जागा मिळाल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्गसारख्या जागा नारायण राणेंना सोडाव्या लागल्या. नाशिक, ठाण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली, तर हिंगोली, यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवार मागे घ्यावे लागले. विधानसभेत तर परिस्थिती आणखी बिकट झाली. भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला केवळ ८७ जागा दिल्या, ज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या आयात नेत्यांना उमेदवारी द्यावी लागली. कुडाळ-मालवण, कन्नड, अंधेरी पूर्व, बोईसर, भिवंडी, मुंबादेवी, पालघर, संगमनेर, करमाळा या जागांवर शिंदेंना भाजपच्या नेत्यांना सामावून घ्यावं लागलं.


मुंबई महापालिका ही शिवसेनेची प्रतिष्ठा आहे. पण यंदा प्रथमच भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. शिंदेंनी जागावाटपात माघार घेतलीय. जास्त जागा लढवण्यापेक्षा विजय महत्त्वाचा, ही त्यांची भूमिका आहे. ही भूमिकाच शिवसेनेची माघार स्पष्ट करतेय. विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १० जागा जिंकल्या, शिंदेंच्या वाट्याला फक्त ६ आल्या तर भाजपाने १५ जागांसह क्रमांक एकचा पक्ष अर्थात मोठा भाऊ म्हणून स्वतःला सिद्ध केलं.


मोठा भाऊ या नात्याने मुंबई महानगरपालिकेच्या जास्तीत जास्त जागांवर दावा करणं ही भाजपाची खेळी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रणनीती आहे. विधानसभेतल्या भरघोस यशानंतर भाजपा बहुमताच्या जवळ पोहोचलाय. त्यामुळे मित्रपक्षांवरचं अवलंबित्व कमी झालंय. मुंबईत महायुतीत लढू असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं तरी त्यांनी जागावाटपात आक्रमक पवित्रा घेतलाय. भाजप स्वतःच्या ताकदीच्या जागा राखत आहे, तर शिंदेंना कमी जागांवर समाधान मानावं लागतंय. त्यातच ठाकरे बंधूंची संभाव्य युती शिंदेंसाठी धोक्याची घंटा ठरणारी आहे. युती झालीच तर त्याचा फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.


मुंबई महापालिकेत २२७ जागा आहेत. आतापर्यंतच्या ट्रेंड पाहिल्यास भाजपा १२०-१४० जागा लढवेल, तर शिंदेंना ६० ते ८० जागांवर समाधान मानावं लागेल. ठाकरे बंधूंची युती झाल्यास शिंदेंच्या जागा ५० पर्यंत खाली येऊ शकतात. शिंदेंचा स्ट्राईक रेट वाढवण्याचा प्रयत्न आहे, पण भाजपच्या दबावाखाली ते यशस्वी होईल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिंदेंच्या माघारीमुळे त्यांच्या पक्षाची ओळख आणि कार्यकर्त्यांचं मनोधैर्य कमी होतंय, अशी चर्चा सुरू झालीय. ही माघार अपरिहार्य आहे की गोची? याचं उत्तर मुंबईचे मतदार देतील.


मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकेल असा विश्वास जरी शिंदेंनी व्यक्त केला तरी आव्हानं मोठं आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ जागावाटपाची लढाई नाही, तर शिवसेनेच्या अस्तित्वाची आणि भाजपच्या वर्चस्वाची लढाई आहे. दोन्ही निवडणुकीतला जागावाटपातला उतरता क्रम पाहता शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करावी लागेल. कारण ते स्वतंत्रपणे लढू शकत नाहीत. त्यामुळे भाजपच्या रणनीतीसमोर त्यांचा टिकाव लागेल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Comments
Add Comment

Pune Nasarapur Crime : आधी पुतणीवर अतिप्रसंग, मग महिलेवर अत्याचार अन् आता 4 वर्षाच्या चिमुकलीचा बळी; भोरमधील नराधमाचा काळा इतिहास उघड!

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली

Bacchu Kadu : टीका करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही; अंगावर ३०० गुन्हे पण... नागपुरात बच्चू कडूंचा घणाघात

नागपूर : "इतर पक्षांनी आणि मोठ्या नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले, आघाड्या केल्या तेव्हा कुणी काही बोलले नाही, पण

Mother's Name Will On Document : आता हजेरीपत्रक आणि गुणपत्रिकेवर आईचं नाव अनिवार्य; सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू

मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून

Maharashtra Board 12th Result 2026 : बारावीचा निकाल ऑनलाईन कुठे आणि कसा पाहायचा? वेबसाईट क्रॅश झाल्यास मोबाईलवरच मिळवा झटपट रिझल्ट!

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, शनिवार २ मे २०२६ रोजी इयत्ता १२ वी (HSC)

HSC Result 2026 : बारावी निकाल २०२६ जाहीर! राज्यात ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण; कोकणाने पुन्हा मारली बाजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज (२ मे २०२६) दुपारी १ वाजता इयत्ता

ED Summons Pratibha Chakankar : खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स; आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असून तपास अधिकच गडद होत चालला आहे.