ओला, उबर चालकांचे आझाद मैदानात आंदोलन


मुंबई : ओला, उबर, रॅपिडो या ॲपआधारित कॅब अथवा बाईक सेवा देणाऱ्या चालकांना योग्य दर मिळावेत यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. कंपन्यांकडून होणारा अन्याय रोखण्यासाठी राज्य सरकारने या चालकांसाठी निश्चित दर लागू करावेत, या मागणीसाठी मुंबईसह उपनगरातील कॅब चालकांनी आझाद मैदानात आंदोलन केले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे. लवकर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


सरकारने ॲपआधारित कॅब अथवा बाईक सेवांसाठी दर निश्चित करावेत, ते दर लागू न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी. त्यांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांचा कॅब आणि बाईकचे परवानचे रद्द करावेत; अशी मागणी आंदोलक करत आहेत. ‘सरकारने केवळ ई-बाइक टॅक्सीला मुभा दिली आहे. त्यानुसार प्रोव्हिजनल लायसन्स देण्यात आले. रस्त्यांवर पेट्रोल बाइक टॅक्सींवर प्रवासी वाहतूक सुरू आहे. यामुळे कंपन्यांकडून सरकारच्या अटी-शर्तींचा भंग झाला आहे. यात कंपन्यांनी परिवहन विभागाने निश्चित केलेले भाडेदर अॅपमध्ये दाखवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारण्यात येत आहे’, असा आरोप भारतीय गिग कामगार मंचाने केला आहे. तर मुंबई महानगर क्षेत्रात बेकायदा बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. चालकांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. वारंवार आंदोलन करुन कारवाई झाली नसल्याचे आरोप केले तरी त्यात तथ्य नाही, असे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे म्हणणे आहे.


Comments
Add Comment

कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी! ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याची काळजी कशी घ्याल?

मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून अमेरिकेतील नेवार्क शहराकडे जाणाऱ्या विमानाला (फ्लाइट AI191) टेक-ऑफनंतर तांत्रिक

खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि