ओला, उबर चालकांचे आझाद मैदानात आंदोलन


मुंबई : ओला, उबर, रॅपिडो या ॲपआधारित कॅब अथवा बाईक सेवा देणाऱ्या चालकांना योग्य दर मिळावेत यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. कंपन्यांकडून होणारा अन्याय रोखण्यासाठी राज्य सरकारने या चालकांसाठी निश्चित दर लागू करावेत, या मागणीसाठी मुंबईसह उपनगरातील कॅब चालकांनी आझाद मैदानात आंदोलन केले. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे. लवकर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.


सरकारने ॲपआधारित कॅब अथवा बाईक सेवांसाठी दर निश्चित करावेत, ते दर लागू न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी. त्यांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांचा कॅब आणि बाईकचे परवानचे रद्द करावेत; अशी मागणी आंदोलक करत आहेत. ‘सरकारने केवळ ई-बाइक टॅक्सीला मुभा दिली आहे. त्यानुसार प्रोव्हिजनल लायसन्स देण्यात आले. रस्त्यांवर पेट्रोल बाइक टॅक्सींवर प्रवासी वाहतूक सुरू आहे. यामुळे कंपन्यांकडून सरकारच्या अटी-शर्तींचा भंग झाला आहे. यात कंपन्यांनी परिवहन विभागाने निश्चित केलेले भाडेदर अॅपमध्ये दाखवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारण्यात येत आहे’, असा आरोप भारतीय गिग कामगार मंचाने केला आहे. तर मुंबई महानगर क्षेत्रात बेकायदा बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. चालकांकडून दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. वारंवार आंदोलन करुन कारवाई झाली नसल्याचे आरोप केले तरी त्यात तथ्य नाही, असे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे म्हणणे आहे.


Comments
Add Comment

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे

Chandrashekhar Bawankule : महाराष्ट्रानं विकासालाच कौल दिला!" भाजपच्या मुसंडीनंतर बावनकुळेंनी मानले मतदारांचे आभार

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांचे कल स्पष्ट होऊ लागले असून, भाजपने महायुतीसह मुसंडी मारली