ऑक्टोबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, हवामान विभागाने दिली माहिती

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्यासाठीचा हवामान आणि पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.



देशातील पावसाचा अंदाज


ऑक्टोबर २०२५ मध्ये: देशात सरासरीपेक्षा जास्त, म्हणजेच दीर्घकालीन सरासरीच्या ११५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. (ऑक्टोबर महिन्याची दीर्घकालीन सरासरी  ७५.४ मिमी आहे.)


ईशान्य मान्सून (ऑक्टोबर ते डिसेंबर): या मान्सूनोत्तर हंगामातही देशाच्या अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. विशेषतः दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात (तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, रायलसीमा, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक) सरासरीच्या ११२ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.


मध्य भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्येही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.


वायव्य भारत आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये मात्र सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.



महाराष्ट्रावर काय परिणाम?


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.


विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे.


राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या आणि अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबरमध्येही पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.



तापमानाचा अंदाज


ऑक्टोबर महिन्यात देशाच्या पूर्व-ईशान्य आणि वायव्य भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.


देशाच्या इतर भागांमध्ये कमाल तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहू शकते.

Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत