ऑक्टोबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, हवामान विभागाने दिली माहिती

नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्यासाठीचा हवामान आणि पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार, ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.



देशातील पावसाचा अंदाज


ऑक्टोबर २०२५ मध्ये: देशात सरासरीपेक्षा जास्त, म्हणजेच दीर्घकालीन सरासरीच्या ११५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. (ऑक्टोबर महिन्याची दीर्घकालीन सरासरी  ७५.४ मिमी आहे.)


ईशान्य मान्सून (ऑक्टोबर ते डिसेंबर): या मान्सूनोत्तर हंगामातही देशाच्या अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. विशेषतः दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात (तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, रायलसीमा, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक) सरासरीच्या ११२ टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.


मध्य भारत आणि पूर्वेकडील राज्यांमध्येही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.


वायव्य भारत आणि ईशान्येकडील काही भागांमध्ये मात्र सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.



महाराष्ट्रावर काय परिणाम?


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.


विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे.


राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या आणि अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबरमध्येही पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.



तापमानाचा अंदाज


ऑक्टोबर महिन्यात देशाच्या पूर्व-ईशान्य आणि वायव्य भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.


देशाच्या इतर भागांमध्ये कमाल तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहू शकते.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळ दौऱ्यावर, अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना लावणार हजेरी

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान केरळच्या दौऱ्यावर असतील. हा दौरा

दिल्लीकर गुदमरले, मुंबईकरांचे काय?

दिवाळीनंतर दोन्ही महानगरांची हवा झाली विषारी फटाक्यांच्या प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरचा AQI ४०० पार, मुंबईचाही

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींचं देशवासियांना भावनिक पत्र

नवी दिल्ली : दिवाळीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना एक भावनिक पत्र लिहून शुभेच्छा दिल्या

१० कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी : डीआरआयच्या ऑपरेशन फायर ट्रेलची मोठी कारवाई

नवी दिल्ली: भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने

नागा अतिरेक्यांवर ड्रोन स्ट्राईक ? भारतविरोधी पी. आंग माई ठार ?

नायपिदाव : भारत-म्यानमार सीमेवर बंडखोरांच्या हालचाली वाढू लागल्यामुळे तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर २०

रेड कॉरिडॉर आता ग्रोथ कॉरिडॉर बनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पोलिस स्मृतीदिनानिमित्त वक्तव्य

नवी दिल्ली: पोलीस स्मृतीदिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील पोलीस आणि सुरक्षा दलांच्या