मागील दोन वर्षापेक्षा धरण क्षेत्रात कमी साठा, पण वर्षभराची तहान भागणार....

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी जो पाणीसाठा आवश्यक असतो, तो साठा १ऑक्टोबर रोजी सकाळी घेतल्या जाणाऱ्या पाण्याच्या नोंदीवर ठरला जातो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते, त्यातुलनेत ०१ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार सर्व धरणात केवळ ९८. ७० टक्के अर्थात १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजेच ३५९ दिवसाचा साठा जमा आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यासर्व धरणांमधील पाणी साठा हा १४ लाख २८ हजार ५४९दशलक्ष लिटर अर्थात १लाख ४२ हजार ८५४ कोटी लिटर एवढा जमा झाला आहे. जुलै महिन्यांपासूनच या सर्व तलावांमधील पाणी साठा हा मागील दोन वर्षांच्या तुलने दुपटीने पुढे होता. त्यामुळेकाही दिवस धरणाचे दरवाजे उघडून त्यातील पाणी सोडण्याची वेळ आली होती. पण शेवटच्या तीन ते चार दिवस धरण क्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणातील साठा जो २७ सप्टेंबर रोजी जेवढा होता, त्यात वाढ होण्याऐवजी तो कमी झाला. त्यामुळे २७सप्टेंबर रोजी या सर्व धरणातील पाणी साठा ९९.१३ टक्के एवढा होता, जो आता कमी होऊन ०१ ऑक्टोबर रोजी ९८.७० टक्क्यांवर जाऊन पोहोचला.

विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यापूर्वी पाण्याची पातळी घटल्यानंतर पाणीकपात लागू न करता पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात आला. आणि अपेक्षेपेक्षा तलाव धरण क्षेत्रात अधिक पाऊस पडून ऑगस्टमध्येच सराव धरण काठोकाठ भरली गेली होती. त्यामुळे

०१ ऑक्टोबर रोजीचा मागील तीन वर्षांतील पाणी साठा

सन २०२५ : ९८. ७० टक्के( १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर)

सन २०२४ : ९९.३७ टक्के ( १४ लाख ३८ हजार २२७ दशलक्ष लिटर)

सन २०२३ :९९.१८टक्के (१४ लाख ३५ हजार ४५९ दशलक्ष लिटर)
Comments
Add Comment

Poison Capsule Case: विषारी कॅप्सूल वाटप प्रकरणात सायको किलरचा मास्टरप्लॅन; AI ला विचारले नको ते प्रश्न 

मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर