मागील दोन वर्षापेक्षा धरण क्षेत्रात कमी साठा, पण वर्षभराची तहान भागणार....

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी जो पाणीसाठा आवश्यक असतो, तो साठा १ऑक्टोबर रोजी सकाळी घेतल्या जाणाऱ्या पाण्याच्या नोंदीवर ठरला जातो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते, त्यातुलनेत ०१ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार सर्व धरणात केवळ ९८. ७० टक्के अर्थात १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे. म्हणजेच ३५९ दिवसाचा साठा जमा आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी यासर्व धरणांमधील पाणी साठा हा १४ लाख २८ हजार ५४९दशलक्ष लिटर अर्थात १लाख ४२ हजार ८५४ कोटी लिटर एवढा जमा झाला आहे. जुलै महिन्यांपासूनच या सर्व तलावांमधील पाणी साठा हा मागील दोन वर्षांच्या तुलने दुपटीने पुढे होता. त्यामुळेकाही दिवस धरणाचे दरवाजे उघडून त्यातील पाणी सोडण्याची वेळ आली होती. पण शेवटच्या तीन ते चार दिवस धरण क्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणातील साठा जो २७ सप्टेंबर रोजी जेवढा होता, त्यात वाढ होण्याऐवजी तो कमी झाला. त्यामुळे २७सप्टेंबर रोजी या सर्व धरणातील पाणी साठा ९९.१३ टक्के एवढा होता, जो आता कमी होऊन ०१ ऑक्टोबर रोजी ९८.७० टक्क्यांवर जाऊन पोहोचला.

विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यापूर्वी पाण्याची पातळी घटल्यानंतर पाणीकपात लागू न करता पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात आला. आणि अपेक्षेपेक्षा तलाव धरण क्षेत्रात अधिक पाऊस पडून ऑगस्टमध्येच सराव धरण काठोकाठ भरली गेली होती. त्यामुळे

०१ ऑक्टोबर रोजीचा मागील तीन वर्षांतील पाणी साठा

सन २०२५ : ९८. ७० टक्के( १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर)

सन २०२४ : ९९.३७ टक्के ( १४ लाख ३८ हजार २२७ दशलक्ष लिटर)

सन २०२३ :९९.१८टक्के (१४ लाख ३५ हजार ४५९ दशलक्ष लिटर)
Comments
Add Comment

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर