ICC Womens World Cup : भारतीय संघाची विजयी सलामी

गुवाहाटी : भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात शानदार पद्धतीने केली. पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव करत भारताने विजयी सलामी दिली आहे. फंलदाजी आणि गोलंदाजीची आपली जादू दाखवणारी दीप्ती शर्मा ही बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने कठीण परिस्थितीतून बाहेर पडून आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सुरुवातीच्या विकेट गमावल्यानंतर दीप्ती शर्मा (८७ धावा) आणि अमनजोत कौर (५७ धावा) यांनी सातव्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करून संघाला बळकटी दिली. हरलीन देओल (४८) आणि प्रतीका रावल (३७) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

डीएलएस पद्धतीने २७१ धावांचे लक्ष्य ठेवणाऱ्या श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत २११ धावांतच गारद झाला. फक्त कर्णधार चामारी अटापट्टू (४३), निलाक्षी डी सिल्वा (३५) आणि हर्षिता समरविक्रमा (२९) यांनाच काहीसा प्रतिकार करता आला.गोलंदाजीत दीप्ती शर्माने तीन विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इतर गोलंदाजांनी सातत्याने दबाव कायम ठेवला आणि भारताला विजय साकारुन दिला.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स