गौतमी पाटीलच्या गाडीला पुण्यात अपघात, रिक्षाचालकासह ३ जखमी

पुणे: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कारला पुण्यात भीषण अपघात झाला. पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ (नवले ब्रिज परिसरात) हा अपघात झाला असून, यामध्ये रिक्षाचालकासह तीन जण जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार,पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. गौतमी पाटीलच्या भरधाव वेगातील कारने या उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात रिक्षाचालकासह रिक्षातील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


अपघाताच्या वेळी नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या गाडीमध्ये नव्हती, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी गौतमीच्या वाहन चालकाला तातडीने ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.


ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला की, यामागे अन्य कोणते तांत्रिक कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला होता.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे