Ashish Shelar : गांधी-शास्त्रींचे दुर्मिळ दस्तऐवज खुले! सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या हस्ते मुलुंडमधील प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाने आयोजित केलेल्या एका विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघामध्ये आयोजित केलेल्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित अत्यंत दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रे आणि छायाचित्रे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाचा पुराभिलेख संचालनालय (Directorate of Archives) 'सेवा सप्ताह' निमित्ताने हे विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागरिकांना खास आवाहन केले.




"राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची दस्तऐवजे प्रदर्शनामध्ये सर्वसामान्यांसाठी शासनाने खुली केली आहेत. आपली ही ऐतिहासिक विरासत जास्तीत जास्त नागरिकांनी नक्की पहावी," असे आवाहन मंत्री शेलार यांनी केले. या प्रदर्शनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी संबंधित अनेक दुर्मिळ वस्तू मांडण्यात आल्या आहेत. दुर्मीळ छायाचित्रे, महत्त्वाची पत्रे, काही इतर आवश्यक कागदपत्रे या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक आमदार मिहीर कोटेचा, पुराभिलेखागार विभागाचे संचालक सुजीत उगले आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री शेलार यांनी यावेळी महाराष्ट्राच्या पुराभिलेख समृद्धीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "राज्य शासनाकडे एकूण साडे सतरा कोटी (१७.५ कोटी) इतकी ऐतिहासिक कागदपत्रे आहेत आणि कागदपत्रांच्या दृष्टीने महाराष्ट्र अत्यंत समृद्ध आहे." ही महत्त्वाची कागदपत्रे योग्य पद्धतीने जतन व्हावीत, यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, शासन वांद्रे-कुर्ला संकुलात पुराभिलेख भवन उभे करत आहे. हे भवन पूर्ण झाल्यावर ही कागदपत्रे अभ्यासकांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Comments
Add Comment

Bacchu Kadu : टीका करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही; अंगावर ३०० गुन्हे पण... नागपुरात बच्चू कडूंचा घणाघात

नागपूर : "इतर पक्षांनी आणि मोठ्या नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले, आघाड्या केल्या तेव्हा कुणी काही बोलले नाही, पण

Mother's Name Will On Document : आता हजेरीपत्रक आणि गुणपत्रिकेवर आईचं नाव अनिवार्य; सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू

मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून

Maharashtra Board 12th Result 2026 : बारावीचा निकाल ऑनलाईन कुठे आणि कसा पाहायचा? वेबसाईट क्रॅश झाल्यास मोबाईलवरच मिळवा झटपट रिझल्ट!

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज, शनिवार २ मे २०२६ रोजी इयत्ता १२ वी (HSC)

HSC Result 2026 : बारावी निकाल २०२६ जाहीर! राज्यात ८९.७९% विद्यार्थी उत्तीर्ण; कोकणाने पुन्हा मारली बाजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज (२ मे २०२६) दुपारी १ वाजता इयत्ता

ED Summons Pratibha Chakankar : खरात प्रकरणात मोठी कारवाई! प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स; आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असून तपास अधिकच गडद होत चालला आहे.

Breaking News : धक्कादायक! ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर

पुणे : जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका गावात चार वर्षांच्या