IND vs PAK: पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवने केली मोठी घोषणा, वाचून तुम्हालाही त्याचा अभिमान वाटेल...

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर दमदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भावूक घोषणा केली आहे. त्याने या स्पर्धेतील आपली संपूर्ण मॅच फी भारतीय लष्कराला देण्याचा निर्णय जाहीर केला.


या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव सुरुवातीपासूनच दिसून येत होता. विशेषतः पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये अधिक तणाव निर्माण झाला. या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले आणि निरपराध नागरिकांचाही बळी गेला. या पार्श्वभूमीवर, सूर्यकुमारने स्पर्धेतील पहिल्या सामन्यानंतरच हा विजय भारतीय सेनेला समर्पित केला होता. आता अंतिम सामन्यातील विजयानंतर त्याने आपली संपूर्ण मॅच फी दान करण्याचा निर्णय घेऊन आपले विचार कृतीत उतरवले आहेत.


या सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. याच पार्श्वभूमीवर सूर्यकुमारने हा निर्णय घेऊन देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रती आणि दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबांप्रति आपली सहवेदना व्यक्त केली आहे. त्याच्या या निर्णयाने देशभरातून त्याचे कौतुक होत आहे.





सूर्यकुमारची प्रतिक्रिया


सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका संदेशात सूर्यकुमारने लिहिले, "मी या स्पर्धेतील माझी मॅच फी आपल्या भारतीय जवानांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पीडित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही नेहमी माझ्या विचारात राहता." त्याच्या या ट्विटला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Comments
Add Comment

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या

बडोद्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 'विराट' विजय

बडोदा : भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली.

टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर अखेर शुभमनचे मौन सुटले

बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल

जेमिमाला दिलेलं वचन सुनील गावस्कर यांनी पाळलं

मुंबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी दिलेले एक खास वचन अखेर पूर्ण झाले आहे. भारतीय संघाने विश्वचषक