पूरग्रस्तांसाठी दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत!

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिला आधार!


लातूर : अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी पहाटेपर्यंत अतिवृष्टीचे स्वरूप धारण केले. तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक गावांचा अहमदपूर शहराशी असलेला संपर्क तुटला होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत दोन महिला अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता, भर पावसात फिल्डवर उतरून जे गौरवशाली कार्य केले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


​ज्यावेळी अनेक नागरिक घरात सुरक्षित ठिकाणी थांबले होते, त्यावेळी उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर या दोन कर्तव्यदक्ष महिला अधिकारी मदतीसाठी पुढे सरसावल्या.


​शनिवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असतानाही, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. त्यांनी केवळ कार्यालयात बसून सूचना दिल्या नाहीत, तर स्वतः भर पावसात, रस्त्यावर उतरून अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांना धीर दिला आणि तातडीने मदत व बचाव कार्याला गती दिली.


चिलखा येथील मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या तीन मजुरांना सुखरूप बाहेर निघेपर्यत दोन्ही महीला अधिकारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सोबत भर पावसात उभ्या राहुन बच्याव कार्यावर थेट लक्ष ठेवत होत्या


​पावसाचा जोर, तुटलेले रस्ते आणि वाढलेला पाण्याचा प्रवाह यामुळे परिस्थिती गंभीर असताना, या दोन महिला अधिकाऱ्यांनी दाखवलेली कर्तबगारी, समर्पण आणि धाडस वाखाणण्याजोगे आहे. प्रशासकीय काम आणि जबाबदारी पार पाडताना 'महिला' म्हणून कोणताही वेगळा विचार न करता, त्यांनी चोवीस तास परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.


​पुराचे पाणी कमी झाल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे सुरू करणे, विस्थापित कुटुंबांना सुरक्षित निवारा आणि अन्न-पाण्याची व्यवस्था करणे, तसेच संपर्क तुटलेल्या गावांमध्ये मदत पोहोचवण्याचे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले.


​उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी संकटकाळी केलेल्या या असाधारण कामगिरीबद्दल संपूर्ण तालुका त्यांचे आभार व्यक्त करत आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाचे नेतृत्व कसे असावे, याचा आदर्श वस्तुपाठच या दोन महिला अधिकाऱ्यांनी घालून दिला आहे.

Comments
Add Comment

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात ; लालपरी, कारच्या अपघातात तीनजण गंभीर

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad highway) कोल्हार खुर्द शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कारचा समोरासमोर भीषण

Ahilyanagar : धुवाधार पावसाचा कहर ! घाटघर येथे ३२१ मिमी पावसाची नोंद, अनेक धबधबे, किल्ले आणि ट्रेकिंग मार्गांवर प्रवेशबंदी

Ahilyanagar : अकोले तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून हरिश्चंद्रगड-भंडारदरा (Harishchandragad and Bhandardara) परिसरात

Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026 : तुकोबाराय व माऊलींच्या पालखी स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी

Satara : महाबळेश्वरमध्ये 24 तासांत 513 मिमिची नोंद, 100 वर्षांतील विक्रमी पाऊस

Satara : मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई (Mumbai), पुणे , नाशिक याठिकाणी पावसाने मोठ्या

Chandrashekhar Bawankule : गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी कोकणासह प्रमुख शहरांमध्ये 'ड्रोन' सर्वेक्षण

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा; गौण खनिजांच्या देखरेखीसाठी कोकणात हायटेक

Maharashtra Monsoon Update : मान्सून 'ब्रेक'वर जाणार! ८ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढील १० दिवस महत्त्वाचे

मुंबई : मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात जुलैच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाने हजेरी लावली असली, तरी संपूर्ण राज्यात