आज, उद्या राज्यात मुसळधारेचा इशारा

५ ऑक्टोबरपर्यंत नैऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रात ठिय्या


मुंबई (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात तपार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट‌धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात औरंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने २९ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने म्हटले आहे की, राज्यात ५ ऑक्टोबरपूर्वी नैऋत्य मोसमी पाऊस परतण्याची शक्यता नाही.


दक्षिण विदर्भ आणि मराठवाड्याला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये काल दुपारपासून पाऊस सुरू आहे. मराठवाडा व विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येहलका पाऊस व ढगाळ वातावरण राहू शकते. याव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट प्रदेश, कोल्हापूर घाट प्रदेश, सातारा घाट प्रदेश, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये असाच मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे.


प्रशासनाची तयारी : राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने नागरिकाना सतर्कतेचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी हे चोवीस तास (२४४७) उपलब्ध कार्यरत आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संपर्क क्रमांकः ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील