आज, उद्या राज्यात मुसळधारेचा इशारा

५ ऑक्टोबरपर्यंत नैऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रात ठिय्या


मुंबई (प्रतिनिधी) : बंगालच्या उपसागरात तपार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट‌धामुळे मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात औरंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने २९ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने म्हटले आहे की, राज्यात ५ ऑक्टोबरपूर्वी नैऋत्य मोसमी पाऊस परतण्याची शक्यता नाही.


दक्षिण विदर्भ आणि मराठवाड्याला लागून असलेल्या प्रदेशांमध्ये काल दुपारपासून पाऊस सुरू आहे. मराठवाडा व विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येहलका पाऊस व ढगाळ वातावरण राहू शकते. याव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट प्रदेश, कोल्हापूर घाट प्रदेश, सातारा घाट प्रदेश, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये असाच मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे.


प्रशासनाची तयारी : राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याने नागरिकाना सतर्कतेचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदतीसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी हे चोवीस तास (२४४७) उपलब्ध कार्यरत आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संपर्क क्रमांकः ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ०२२-२२०२३०३९, ९३२१५८७१४३.

Comments
Add Comment

Aapli Chikitsa योजनेत विश्वासघात,तरीही महापालिकेने दाखवला विश्वास

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांवर केला जाणारा खर्च कमी व्हावा आणि रुग्णांना

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये आता अखंडित विद्युत पुरवठा...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या रावळी कॅम्प प्रसूतीगृह वगळता सर्व प्रसूतीगृहांमध्ये विद्युत पुरवठा

एसआरए इमारतींना आपत्कालीन जिना उभारणार

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनांतर्गत उभारलेल्या मुंबईतील तब्बल एक हजार सात मजली जुन्या इमारतींना आता बाहेरील

अपुऱ्या व्यवस्थेमुळे वरळी येथील बीडीडीकर त्रस्त

मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीतील रहिवासी मोठ्या आशेने १६० चौरस फुटांच्या घरातून टॉवरमधील नव्या ५०० चौरस

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला