क्रिकेटप्रेमींसाठी मोठा दिवस !आज भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया कपचा फायनल सामना

दुबई: क्रिकेटप्रेमींसाठी आज मोठा दिवस आहे. आशिया कप २०२५ चा अंतिम सामना पारंपरिक प्रतिस्पर्धक भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल. अंतिम विजेतेपदासाठी त्यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.आशिया चषकातील १७ हंगाम आणि ४१ वर्षांनंतर हा योगायोग जुळून आला आहे


 भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय संघ आशिया कपमध्ये आतापर्यंत एकही सामना हरला नाही. सुपर-४ मध्ये सुद्धा भारतीय संघाने विजयाचा आलेख उंचावला, गुणतालिकेत भारतीय संघाचा दबदबा स्पष्ट दिसला. सलामीवीर आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे.


सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शुक्रवारी सुपर-४ मधील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेला हरवले. भारताने सुरुवातीला फलंदाजी केली. श्रीलंकेच्या संघाने सुद्धा भारताला कडवी झुंज दिली. दरम्यान २० षटकांत भारताने २०२ धावांचा डोंगर उभारला. पण त्यांना लक्ष्य गाठताना दमछाक झाली. सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकला पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने आशिया कप २०२५ मध्ये विजयी घोडदौड कायम ठेवली. भारतीय संघाला या सामन्यात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण अंतिम सामन्यात जेव्हा भारत पाकिस्तान संघ आमने-सामने आले आहेत, तेव्हा पाकिस्तानचे पारडे जड राहिलं आहे.



पाकिस्तानला लोळवण्याची सुवर्णसंधी


पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कपवर भारताने बहिष्कार घालण्याची मागणी होत होती. पण भारत नसला तर व्यावसायिक मोठे नुकसान होते. त्यामुळे हे सामने खेळवले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. गेल्या दोन सानन्यांनंतर भारतात कुठेही मोठा जल्लोष दिसला नाही. मात्र भारताकडे आज पाकिस्तानला पुन्हा लोळवण्याची संधी चालून आली आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यात पाक संघाला नामोहरम केले, आता अंतिम सामन्यात पाक संघाला त्याच्या गर्वासह लोळवा असा संताप भारतीय चाहत्यांचा आहे.


इंडिया 'सुपर ४ गुणतालिकेत सर्वांत आघाडीवर आहे. आशिया चषकात ६ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. तर दोन सामने जिंकणारा पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता अंतिम सामन्यासाठी पुन्हा पाकिस्तानसोबत भारताचा सामना होणार आहे. आशिया कपमध्ये हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.


Comments
Add Comment

मुंबईच्या पराभावनंतर दिग्गज खेळाडू संतापला.. हार्दिकवर जोरदार टिका; वो दिखाऊ कॅप्टेन हे....

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. मुंबईने नऊ साखळी

प्लेऑफशीची शर्यत रंगली ; अव्वल स्थानासाठी टॉप पाच संघात झुंज.....

IPL 2026 : आयपीएल २०२६ आता रंगतदार होताना दिसत आहे. गुणवतालिकेत अव्वल पाच संघात जोरदार सामने होत आहेत. प्रत्येक संघ

Thomas Cup 2026 : भारताचा उपांत्य फेरीत फ्रान्सकडून पराभव; कांस्य पदकावर समाधान

कोपनहेगन : डेन्मार्कच्या हॉर्सेन्स येथे झालेल्या थॉमस कप २०२६ च्या उपांत्य फेरीत भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला

MI IPL 2026 : मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपुष्टात

चेन्नई :  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२६ चा हंगाम जवळपास संपला आहे. चेन्नई

GT VS PBKS : सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात गुजरात; पंजाब किंग्स पुनरागमनासाठी सज्ज

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज ( 5 मे शनिवार ) संध्याकाळी 7:30 वाजता गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात महत्त्वाची लढत

IPL 2026 मध्ये आज हैदराबाद-कोलकाता आमनेसामने; सलग पाच विजयांमुळे सनरायझर्स हैदराबादचा आत्मविश्वास उंचावला, कोलकातासाठी करो या मरोचा सामना

हैदराबाद : आयपीएल २०२६ मध्ये आज डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि